शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

आरक्षणाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर आझाद यांनी भागवतांना दिलं खुल्या चर्चेचं आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 10:51 IST

आरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.

ठळक मुद्देआरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. जातिव्यवस्था संपवण्यासंदर्भात चर्चेमधून संवाद होणं गरजेचं असल्याचं देखील आझाद यांनी म्हटलं आहे.सरकारने आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला तर लोक रस्त्यावर उतरतील - चंद्रशेखर आझाद

नवी दिल्ली - देशातील आरक्षण व्यवस्थेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असते. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोहन भागवत यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. तसेच जातिव्यवस्था संपवण्यासंदर्भात चर्चेमधून संवाद होणं गरजेचं असल्याचं देखील आझाद यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर आझाद यांनी 'आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांमध्ये चर्चा झाली पाहिजे असं भागवत यांना वाटतं. प्रसारमाध्यमं आणि संबंधित पक्षांच्या समोर मी त्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आव्हान देतो. जातिव्यवस्थेमुळे आम्हाला जे काही सहन करावं लागतं ते आम्हाला मांडायचे आहे. भागवत यांनी चर्चेला आलं पाहिजे. स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी 54 टक्के दलितांकडे स्वत: च्या मालकीची जमीन नाही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरक्षण व्यवस्थेबद्दल चर्चेचा मुद्दा मांडून आपली दलितविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे' असं म्हटलं आहे. 

'भागवत यांनी जातीव्यवस्था संपवण्याचा मुद्दा मांडला असता तर भीम आर्मीने त्यांचं समर्थन केलं असतं. जातीव्यवस्थेने देशाला पोखरुन ठेवले आहे. भागवत यांनी यावर चर्चा करायला हवी. सरकारने आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला तर लोक रस्त्यावर उतरतील' असं देखील चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात आरक्षणाचे समर्थक आणि विरोधकांनी याविषयी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं होतं. 

एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भागवत यांनी 'जे लोक आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि जे विरोधात आहेत, अशांनी याविषयी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा केली पाहिजे. या संदर्भात मी याआधीही वक्तव्य केले होते. मात्र त्यावेळी खूप विवाद होऊन मूळ मुद्दा भरकटला होता. जे आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांनी आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांचे हित विचारात घेऊन बोलले पाहिजे. तसेच जे आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांनी आरक्षणाच्या समर्थकांची बाजू समजून घेतली पाहिजे' असं म्हटलं होतं.  

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादMohan Bhagwatमोहन भागवतreservationआरक्षणBhim Armyभीम आर्मी