शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

राहुल गांधींनी सांगितले 'हे' ५ स्तंभ; काँग्रेसकडून महिनाभरात कार्यक्रमाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 16:03 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे.

मुंबई - एकीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेते खा. राहुल गांधींनाआसाममधील नगाव येथे मंदिरात जाण्यापासून रोखल्याने काँग्रेस समर्थन आक्रमक झाले होते. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेसने रस्त्यावरच ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. यादरम्यान, राहुल गांधींनी पुढील महिनाभरात काँग्रेसकडून एक कार्यक्रम घोषित केला जात असून ५ स्तंभांवर आधारीत हा कार्यक्रम असणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी 'भारत जोडो न्याय यात्रे'ला गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बॅरिकेड्स तोडले, घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी बळाचाही वापर केल्याचं दिसून आलं. त्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचा उद्देश समजावून सांगितला. 

आम्ही मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान अद्यापही तेथे गेले नाहीत. आम्ही मणिपूरमधून अरुणाचल प्रदेशात गेलो, नागालँडनंतर आता आसाममध्ये आलो आहोत. तुम्ही पाहाताय येथे काय सुरू आहे. आमच्या भारत जोडो न्याय यात्रेमागे न्यायाची संकल्पना आहे. त्यामध्ये, ५ स्तंभ आहेत, जे देशाला ताकद देतील. 

1. युवा न्याय2. भागीदारी3. नारी न्याय4. शेतकरी न्याय 5. कामगारांसाठी न्याय

भारत जोडो न्याय यात्रेची अशी ही ५ स्तंभांची संकल्पना असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. तसेच, या स्तंभासाठी काँग्रेसकडून पुढील महिनाभरात एक कार्यक्रम घोषित केला जाणार असल्याचंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

आसाम सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल

या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुवाहाटीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, यावेळी जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "बजरंग दल याच मार्गाने गेला होता. याच मार्गावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची रॅलीही झाली होती. येथे एक बॅरिकेड होते, आम्ही बॅरिकेड तोडले पण कायदा मोडणार नाही. आम्हाला कमकुवत समजू नका. ही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद आहे. आसाममधील लोकांना दडपले जात आहे. विद्यार्थ्यांसोबत मला चर्चा करू दिली जात नाही. काँग्रेस कार्यकर्ते हे भाजप आणि आरएसएसला घाबरत नाहीत.", अशा शब्दात राहुल गांधींनी आसाम सरकारवर तोफ डागली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसAssamआसाम