शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राहुल गांधींनी सांगितले 'हे' ५ स्तंभ; काँग्रेसकडून महिनाभरात कार्यक्रमाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 16:03 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे.

मुंबई - एकीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेते खा. राहुल गांधींनाआसाममधील नगाव येथे मंदिरात जाण्यापासून रोखल्याने काँग्रेस समर्थन आक्रमक झाले होते. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेसने रस्त्यावरच ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. यादरम्यान, राहुल गांधींनी पुढील महिनाभरात काँग्रेसकडून एक कार्यक्रम घोषित केला जात असून ५ स्तंभांवर आधारीत हा कार्यक्रम असणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी 'भारत जोडो न्याय यात्रे'ला गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बॅरिकेड्स तोडले, घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी बळाचाही वापर केल्याचं दिसून आलं. त्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचा उद्देश समजावून सांगितला. 

आम्ही मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान अद्यापही तेथे गेले नाहीत. आम्ही मणिपूरमधून अरुणाचल प्रदेशात गेलो, नागालँडनंतर आता आसाममध्ये आलो आहोत. तुम्ही पाहाताय येथे काय सुरू आहे. आमच्या भारत जोडो न्याय यात्रेमागे न्यायाची संकल्पना आहे. त्यामध्ये, ५ स्तंभ आहेत, जे देशाला ताकद देतील. 

1. युवा न्याय2. भागीदारी3. नारी न्याय4. शेतकरी न्याय 5. कामगारांसाठी न्याय

भारत जोडो न्याय यात्रेची अशी ही ५ स्तंभांची संकल्पना असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. तसेच, या स्तंभासाठी काँग्रेसकडून पुढील महिनाभरात एक कार्यक्रम घोषित केला जाणार असल्याचंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

आसाम सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल

या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुवाहाटीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, यावेळी जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "बजरंग दल याच मार्गाने गेला होता. याच मार्गावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची रॅलीही झाली होती. येथे एक बॅरिकेड होते, आम्ही बॅरिकेड तोडले पण कायदा मोडणार नाही. आम्हाला कमकुवत समजू नका. ही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद आहे. आसाममधील लोकांना दडपले जात आहे. विद्यार्थ्यांसोबत मला चर्चा करू दिली जात नाही. काँग्रेस कार्यकर्ते हे भाजप आणि आरएसएसला घाबरत नाहीत.", अशा शब्दात राहुल गांधींनी आसाम सरकारवर तोफ डागली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसAssamआसाम