शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी सांगितले 'हे' ५ स्तंभ; काँग्रेसकडून महिनाभरात कार्यक्रमाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 16:03 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे.

मुंबई - एकीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस नेते खा. राहुल गांधींनाआसाममधील नगाव येथे मंदिरात जाण्यापासून रोखल्याने काँग्रेस समर्थन आक्रमक झाले होते. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात काँग्रेसने रस्त्यावरच ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. यादरम्यान, राहुल गांधींनी पुढील महिनाभरात काँग्रेसकडून एक कार्यक्रम घोषित केला जात असून ५ स्तंभांवर आधारीत हा कार्यक्रम असणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. या यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी 'भारत जोडो न्याय यात्रे'ला गुवाहाटीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत बॅरिकेड्स तोडले, घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी बळाचाही वापर केल्याचं दिसून आलं. त्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचा उद्देश समजावून सांगितला. 

आम्ही मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान अद्यापही तेथे गेले नाहीत. आम्ही मणिपूरमधून अरुणाचल प्रदेशात गेलो, नागालँडनंतर आता आसाममध्ये आलो आहोत. तुम्ही पाहाताय येथे काय सुरू आहे. आमच्या भारत जोडो न्याय यात्रेमागे न्यायाची संकल्पना आहे. त्यामध्ये, ५ स्तंभ आहेत, जे देशाला ताकद देतील. 

1. युवा न्याय2. भागीदारी3. नारी न्याय4. शेतकरी न्याय 5. कामगारांसाठी न्याय

भारत जोडो न्याय यात्रेची अशी ही ५ स्तंभांची संकल्पना असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. तसेच, या स्तंभासाठी काँग्रेसकडून पुढील महिनाभरात एक कार्यक्रम घोषित केला जाणार असल्याचंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

आसाम सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल

या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर गुवाहाटीमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, यावेळी जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "बजरंग दल याच मार्गाने गेला होता. याच मार्गावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची रॅलीही झाली होती. येथे एक बॅरिकेड होते, आम्ही बॅरिकेड तोडले पण कायदा मोडणार नाही. आम्हाला कमकुवत समजू नका. ही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद आहे. आसाममधील लोकांना दडपले जात आहे. विद्यार्थ्यांसोबत मला चर्चा करू दिली जात नाही. काँग्रेस कार्यकर्ते हे भाजप आणि आरएसएसला घाबरत नाहीत.", अशा शब्दात राहुल गांधींनी आसाम सरकारवर तोफ डागली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसAssamआसाम