शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Bharat Bandh: ...अन् राहुल गांधींनी वापरला मोदींचा 'तो' डायलॉग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 12:51 IST

पंतप्रधान मोदी अनेकदा वापरत असलेला डायलॉग राहुल गांधींनी भाषणात वापरला

नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं पुकारलेल्या 'भारत बंद'ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात दिल्लीत मोर्चा काढला. राजघाटावरुन सुरू झालेल्या या मोर्चाची सांगता रामलीला मैदानात झाली. याठिकाणी काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात धरणे आंदोलन केलं. कैलास मानसरोवर यात्रेवरुन परतलेल्या राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदींनी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची भाषा केली होती. शेतकऱ्यांना समस्या संपवण्याचं आश्वासन दिलं होतं. लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला. मात्र त्यांनी जनतेची साफ निराशा केली, अशा शब्दांमध्ये राहुल गांधीनी मोदींवर शरसंधान साधलं. यावेळी राहुल यांनी मोदींचा डायलॉग वापरत त्यांच्यावरच टीका केली. 'गेल्या 70 वर्षांमध्ये जे झालं नाही, ते गेल्या 4 वर्षांमध्ये होतं, असं मोदी अनेकदा म्हणतात. मोदी अगदी योग्य बोलतात. आज देशाचा एक नागरिक दुसऱ्या व्यक्तीशी भांडत आहे. त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. कुठे वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तींमध्ये संघर्ष सुरू आहे, तर कुठे दोन जातींमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल गांधी बरसले. मोदी देशवासीयांच्या समस्यांवर मूग गिळून गप्प बसतात, असाही आरोप राहुल यांनी केला.  इंधन दरवाढ, महिलांवरील बलात्कार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी याबद्दल मोदी काहीच बोलत नाही. 2014 मध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. मात्र भाजपा सरकारनं गेल्या 4 वर्षांमध्ये काय केलं, असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. सध्या देशातील कोणालाही योग्य दिशा सापडत नाही. फक्त मोदींच्या उद्योगपती मित्रांना योग्य दिशा सापडली आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर उद्योगपतीधार्जिणे असल्याचा आरोप केला. 'तरुणांकडे रोजगार नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत. सर्वसामान्य जनता महागाईमुळे गॅसवर आहे. चार वर्षांपूर्वी 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 800 रुपयांचा झाला आहे. मात्र तरीही मोदी मूग गिळून गप्प आहेत. आज देशातील काही मोजक्याच लोकांना योग्य दिशा सापडली आहे. मोदींच्या उद्योगपती मित्रांचं सर्वकाही उत्तम सुरू आहे,' असं राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस