Bhagat Singh Koshyari: “मला विमानातून उतरवलं, नियतीनं उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचलं”: भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 07:13 PM2023-02-20T19:13:34+5:302023-02-20T19:14:22+5:30

Bhagat Singh Koshyari: उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवले, असे भगतसिंह कोश्यारींनी म्हटले आहे.

bhagat singh koshyari criticised thackeray group chief uddhav thackeray after resign as maharashtra governor | Bhagat Singh Koshyari: “मला विमानातून उतरवलं, नियतीनं उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचलं”: भगतसिंह कोश्यारी

Bhagat Singh Koshyari: “मला विमानातून उतरवलं, नियतीनं उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचलं”: भगतसिंह कोश्यारी

googlenewsNext

Bhagat Singh Koshyari: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबतचा निर्णय शिंदे गटाच्या बाजून दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी, भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवले होते आता नियतीने उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचले, असा पलटवार भगतसिंह कोश्यारी यांनी केला. 

भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांना मसुरी या ठिकाणी येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे होते. प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचे होते. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरावे लागले होते. या घटनेचा धागा पकडून भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

उद्धव ठाकरे हे संत माणूस, ते कुठे राजकारणात आले?

उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आले. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही. महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवले होते. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून खाली उतरवले. मी त्यांना सत्तेतून खाली उतरवले नाही, अशी टीका भगतसिंह कोश्यारी यांनी केली. न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवले. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता. मी देवापुढे प्रार्थना करतो आहे की त्यांनी या सगळ्यापासून लांब रहावे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bhagat singh koshyari criticised thackeray group chief uddhav thackeray after resign as maharashtra governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.