शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सावधान...५ पैकी एका पुरुषाला होतोय कॅन्सर, ७७% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 10:28 IST

Cancer: भारतासह जगभरात कर्करोग (कॅन्सर) होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. २०२२ मध्ये भारतात १४.१ लाखांपेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त आढळले असून, ९.१ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिनिव्हा/नवी दिल्ली : भारतासह जगभरात कर्करोग (कॅन्सर) होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. २०२२ मध्ये भारतात १४.१ लाखांपेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त आढळले असून, ९.१ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण सामान्य झाले आहे. २०५० पर्यंत कॅन्सर रुग्णांमध्ये ३.५ कोटींपर्यंत वाढ होण्याची भीती आहे. २०२२ मध्ये २ कोटी कॅन्सरग्रस्त आढळले असून, यात तब्बल ७७ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

■ ओठाचा कॅन्सर, जबड्याचा कॅन्सर आणि फुफ्फुसाचा कर्करोग पुरुषांमध्ये सर्वात सामान्य आहे तर, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये सर्वाधिक आहे.■ स्तन कॅन्सरमध्ये २७ टक्के तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढले आहे.■ कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ५ वर्षाच्या आत जिवंत असलेल्या लोकांची संख्या भारतात जवळपास ३२.६ लाख होती.स्तन कॅन्सर वाढतोय- १०.६% कर्करोग होण्याचा धोका भारतात वाढला आहे.-७.२% कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा धोका भारतात वाढला आहे.- २०% कर्करोग होण्याचे प्रमाण जगभरात वाढले आहे.- ९.६% कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण जगभरात वाढले आहे.

योग्य उपचार मिळेनात, लवकर निदान होईना१८५ देशांचा अभ्यास यात करण्यात आला. यातील केवळ ३९ टक्के लोकांना कॅन्सरवर उपचार करताना योग्य पॅकेज मिळाले. तर २८ टक्के लोकांची अतिरिक्त्त कव्हर, वेदना कमी करण्यासाठी योग्य काळजी घेण्यात आली. लवकर निदान होत नसल्याने कॅन्सर रुग्णात वाढ होतेय.

तंबाखू घेतोय जीव आशियामध्ये तंबाखू फुफ्फुसाचा कर्करोग वाढण्याचे प्रमुख कारण आहे. स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्यपणे आढळणारा कॅन्सर आहे. जगात ७ टक्के मृत्यू हे स्तन कॅन्सरने होत आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर...गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सार्वजनिक आरोग्य समस्या निर्माण झाली असून, जगभरात यासाठी मोहीम सुरू झाली आहे. या अंतर्गत ९० टक्के मुलींना १५ वर्षे होण्याआधी ह्युमन पॅपिलोमा विषाणू (एचपीव्ही) लस टोचण्यात येत आहे.जगात किती वाढला कॅन्सर? जागतिक स्तरावर ९७ लाख कॅन्सरग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. ५ पैकी एका पुरुषाला कॅन्सर होत असून ९ पैकी १ पुरुष आणि १२ पैकी १ महिलेचा कॅन्सरमुळे मृत्यू होत आहे.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यIndiaभारत