शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

#Flashback2017 : हे आहेत मावळत्या वर्षातील गाजलेले वादविवाद

By balkrishna.parab | Updated: December 27, 2017 15:18 IST

भारतातील राजकारण आणि वादविवाद यांचं अगदी जवळचं नातं आहे. सरतं वर्षही अशाच राजकीय वादविवादांनी गाजलं.

भारतातील राजकारण आणि वादविवाद यांचं अगदी जवळचं नातं आहे. सरतं वर्षही अशाच राजकीय वादविवादांनी गाजलं. अनेक नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोदा वादही निर्माण झाला. निवडणुकांच्या निमित्ताने झाडलेल्या आरोपांच्या फैरी आणि त्यावरुन झालेले आरोप - प्रत्यारोप यामुळे 2017 वर्ष चांगलंच गाजलं. 

- मोदींचा नीच व्यक्ती म्हणून उल्लेखराजकारणात अनेक वाद हे किरकोळ असतात. त्यातून फारसा लाभ होत नाही. मात्र कधीकधी अनवधानाने केलेले वक्तव्यही फार नुकसान करून जाते. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी गुजरात निवडणूक ऐन रंगात आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नीच किस्मका आदमी असा केला. मणिशंकर अय्यर यांचे हे वक्तव्य काँग्रेसला बरेच महाग पडले. मोदी आणि भाजपाने या वक्तव्यावरून रान पेटवले. त्यामुळे सत्ताविरोधी लहरीचा सामना करत असलेल्या  निर्णायक क्षणी भावनिक राजकारण करून आपली सत्ता टिकवता आली.

- अण्णा द्रमुकमधील अंधाधुंदीगतवर्षी जयललिता यांचे निधन झाल्यानंतर नेतृत्वहीन झालेल्या अण्णा द्रमुकमधील अंधाधुंदी तीव्र झाली. त्यात जयललिता यांच्या पश्चात सत्तासुत्रे हाती घेणाऱ्या शशिकला यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर पक्षातील बंडाळी तीव्र झाली. त्यातून पक्षात पनीरसेल्वम, पलानीस्वामी आणि दिनकरन असे तीन गट पडले. या तिन्ही गटांनी अण्णा द्रमुकच्या निवडणूक चिन्हावर दावा केल्याने  निवडणूक आयोगाला अण्णा द्रमुकचे दोन पाने असलेले चिन्ह गोठवावे लागले. नुकत्याच आटोपलेल्या आर.के. नगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दिनकरन यांनी अम्मांचे आपणच खरे वारस असल्याचा दावा केल्याने अण्णा द्रमुक पक्षातील वाद नव्या वर्षात अधिकच उफाळून येण्याची शक्यता आहे.

- समाजवादी पक्षातील भाऊबंदकीमुलायमसिंग यादव आणि त्यांच्या वारस गोतावळ्याचा भरणा असलेल्या समाजवादी पक्षातील भाऊबंदकीमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच चर्चेत राहिले. एकीकडे मुलायम सिंग यादव त्यांचे भाऊ शिवपाल यादव आणि मुलायमसिंगांच्या दुसऱ्या पत्नीचे कुटुंबीय. तर दुसरीकडे मुलायमसिंगांचे चिरंजीव अखिलेश यादव आणि मुलायमसिंगांचे चुलतभाऊ प्रा. रामगोपाल यादव यांच्यात पक्षातील वर्चस्वावरून बरीच रस्सीखेच झाली. अखेर या चढाओढीत अखिलेश यादव यांनी बाजी मारत पक्ष संघटनेवर ताबा मिळवला. पण अंतर्गत बंडाळीमुळे सपाला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला.

- मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर केलेली रेनकोट टिप्पणीफर्डे वक्ते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली. विशेषतः राज्यसभेत डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना मोदींनी  रेनकोट घालून आंघोळ करावी, हे मनमोहन सिंग यांना माहीत आहे, अशी केलेली टिप्पणी वादाचा मुद्दा ठरली होती.

- नितीशकुमार विरुद्ध शरद यादवबिहारमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलामध्येही भाजपाशी पुन्हा आघाडी करण्यावरून फूट पडली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा एक गट आणि ज्येष्ठ नेते शरद यादव यांचा गट निर्माण झाला. मात्र खासदार आणि आमदारांचा मोठा गट नितीश कुमार यांच्या मागे उभा राहीला. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह नितीश कुमार यांच्या गटाकडे बहाल केले. त्यानंतर उपराष्ट्रपतींनी शरद यादव यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे संयुक्त जनता दलावर नितीशकुमार यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

- गुजरात राज्यसभा निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने गुजरात मधील राज्यसभा निवडणूक लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरली. आमदारांची फोडाफोडी, दबाव तंत्र असे सगळे प्रकार झाल्याने निकाल देताना निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या घडमोडींनंतर निवडणूक आयोगाने अहमद पटेल यांच्या बाजूने निकाल दिला. 

टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017Flashback 2017फ्लॅशबॅक 2017Politicsराजकारण