शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

#Flashback2017 : हे आहेत मावळत्या वर्षातील गाजलेले वादविवाद

By balkrishna.parab | Updated: December 27, 2017 15:18 IST

भारतातील राजकारण आणि वादविवाद यांचं अगदी जवळचं नातं आहे. सरतं वर्षही अशाच राजकीय वादविवादांनी गाजलं.

भारतातील राजकारण आणि वादविवाद यांचं अगदी जवळचं नातं आहे. सरतं वर्षही अशाच राजकीय वादविवादांनी गाजलं. अनेक नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोदा वादही निर्माण झाला. निवडणुकांच्या निमित्ताने झाडलेल्या आरोपांच्या फैरी आणि त्यावरुन झालेले आरोप - प्रत्यारोप यामुळे 2017 वर्ष चांगलंच गाजलं. 

- मोदींचा नीच व्यक्ती म्हणून उल्लेखराजकारणात अनेक वाद हे किरकोळ असतात. त्यातून फारसा लाभ होत नाही. मात्र कधीकधी अनवधानाने केलेले वक्तव्यही फार नुकसान करून जाते. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी गुजरात निवडणूक ऐन रंगात आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नीच किस्मका आदमी असा केला. मणिशंकर अय्यर यांचे हे वक्तव्य काँग्रेसला बरेच महाग पडले. मोदी आणि भाजपाने या वक्तव्यावरून रान पेटवले. त्यामुळे सत्ताविरोधी लहरीचा सामना करत असलेल्या  निर्णायक क्षणी भावनिक राजकारण करून आपली सत्ता टिकवता आली.

- अण्णा द्रमुकमधील अंधाधुंदीगतवर्षी जयललिता यांचे निधन झाल्यानंतर नेतृत्वहीन झालेल्या अण्णा द्रमुकमधील अंधाधुंदी तीव्र झाली. त्यात जयललिता यांच्या पश्चात सत्तासुत्रे हाती घेणाऱ्या शशिकला यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर पक्षातील बंडाळी तीव्र झाली. त्यातून पक्षात पनीरसेल्वम, पलानीस्वामी आणि दिनकरन असे तीन गट पडले. या तिन्ही गटांनी अण्णा द्रमुकच्या निवडणूक चिन्हावर दावा केल्याने  निवडणूक आयोगाला अण्णा द्रमुकचे दोन पाने असलेले चिन्ह गोठवावे लागले. नुकत्याच आटोपलेल्या आर.के. नगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दिनकरन यांनी अम्मांचे आपणच खरे वारस असल्याचा दावा केल्याने अण्णा द्रमुक पक्षातील वाद नव्या वर्षात अधिकच उफाळून येण्याची शक्यता आहे.

- समाजवादी पक्षातील भाऊबंदकीमुलायमसिंग यादव आणि त्यांच्या वारस गोतावळ्याचा भरणा असलेल्या समाजवादी पक्षातील भाऊबंदकीमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच चर्चेत राहिले. एकीकडे मुलायम सिंग यादव त्यांचे भाऊ शिवपाल यादव आणि मुलायमसिंगांच्या दुसऱ्या पत्नीचे कुटुंबीय. तर दुसरीकडे मुलायमसिंगांचे चिरंजीव अखिलेश यादव आणि मुलायमसिंगांचे चुलतभाऊ प्रा. रामगोपाल यादव यांच्यात पक्षातील वर्चस्वावरून बरीच रस्सीखेच झाली. अखेर या चढाओढीत अखिलेश यादव यांनी बाजी मारत पक्ष संघटनेवर ताबा मिळवला. पण अंतर्गत बंडाळीमुळे सपाला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला.

- मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर केलेली रेनकोट टिप्पणीफर्डे वक्ते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली. विशेषतः राज्यसभेत डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना मोदींनी  रेनकोट घालून आंघोळ करावी, हे मनमोहन सिंग यांना माहीत आहे, अशी केलेली टिप्पणी वादाचा मुद्दा ठरली होती.

- नितीशकुमार विरुद्ध शरद यादवबिहारमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलामध्येही भाजपाशी पुन्हा आघाडी करण्यावरून फूट पडली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा एक गट आणि ज्येष्ठ नेते शरद यादव यांचा गट निर्माण झाला. मात्र खासदार आणि आमदारांचा मोठा गट नितीश कुमार यांच्या मागे उभा राहीला. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह नितीश कुमार यांच्या गटाकडे बहाल केले. त्यानंतर उपराष्ट्रपतींनी शरद यादव यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे संयुक्त जनता दलावर नितीशकुमार यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

- गुजरात राज्यसभा निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने गुजरात मधील राज्यसभा निवडणूक लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरली. आमदारांची फोडाफोडी, दबाव तंत्र असे सगळे प्रकार झाल्याने निकाल देताना निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या घडमोडींनंतर निवडणूक आयोगाने अहमद पटेल यांच्या बाजूने निकाल दिला. 

टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017Flashback 2017फ्लॅशबॅक 2017Politicsराजकारण