शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आगीचे गोळे झेलणाऱ्या हत्तींच्या फोटोला सर्वोत्तम छायाचित्राचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 15:03 IST

या छायाचित्रकाराने अचूक वेळी टीपलेल्या या फोटोने त्याला सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार मिळवून दिलाय.

ठळक मुद्देस्थानिक आपल्या जीवाच्या संरक्षणासाठी हत्तींवर आगीचे गोळे फेकत असल्यामुळे हत्तींची संख्या कमी होत आहे. शेतात शिरणाऱ्या हत्तींना बाहेर हाकलवण्यासाठी आगीचे गोळे फेकले जातात. खरंतर हत्ती आपल्या वस्तीत येत नसून प्राण्यांच्याच जागा आपण लाटल्या आहेत.

पश्चिम बंगाल : पूर्वी जंगल-रानातून भटकताना किंवा काट्याकुट्यातून चालताना हिंस्र प्राण्यांचा त्रास होऊ नये याकरता फटाके फोडले जायचे. हीच पद्धत आजही वापरली जाते. पण आता आपल्या बचावासाठी नव्हे तर प्राण्यांना मारण्यासाठी जंगलात फटाके फोडले जातात किंवा त्यांच्या आगीचे गोळे फेकले जातात. पश्चिम बंगालच्या एका जंगलात धुडगुस घालणाऱ्या हत्तीणीला आणि तिच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आग लावली, त्यामुळे दोन्ही हत्ती आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले असल्याचा एक फोटो समोर आला आहे. नुकताच घोषित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय वन्यजीव प्राणी छायाचित्र स्पर्धा २०१७ मध्ये आगीपासून बचावासाठी जीव तोडून पळणाऱ्या हत्तीण आणि तिच्या पिल्लाच्या फोटोला पुरस्कार मिळालाय. या पुरस्कारानंतर हा फोटो सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला.

विप्लाव हाजरा असं या फोटोग्राफरचं नाव आहे. या फोटोला हेल इज हिअर अशी कॅप्शनही देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा गावातला हा फोटो आहे. या गावात हत्तींनी प्रचंड उच्छाद मांडला आहे. त्यामुळे हत्तींमुळे शेताचे नुकसान होऊ नये याकरता शेतात शिरणाऱ्या हत्तींना बाहेर हाकलवण्यासाठी आगीचे गोळे किंवा फटाके फोडले जातात. या चित्रात दिसल्याप्रमाणे हत्तींवर आगीचे गोळे फेकण्यात आलेले आहेत. खरंतर पश्चिम बंगालमध्ये हत्तींचा वावर नित्याचाच आहे. त्यामुळे इथे पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात.

यावर्षीच्या मार्च महिन्यात पश्चिम बंगालच्या वन प्राधिकरणाकडून हत्तींपासून सावध राहण्याचे संदेश देण्यात आले होते. हत्ती पाणी, अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येत आहेत, त्यामुळे नागरिकांनी खबरदारीने राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. गेल्यावर्षी अशाचप्रकारे हत्तींनी नागरिवस्तीत धुमाकुळ घातल्याने जवळपास २९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मानव आणि हत्तींच्या संघर्षात कोणाचाही जीव जाऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन वन प्राधिकरणामार्फत देण्यात येत होते. मात्र स्थानिक आपल्या जीवाच्या संरक्षणासाठी हत्तींवर आगीचे गोळे फेकत असल्यामुळे हत्तींची संख्या कमी होत असल्यची चिंता व्यक्त करण्यात येतेय.

खरंतर हत्ती आपल्या वस्तीत येत नसून प्राण्यांच्याच जागा आपण लाटल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी जागाच उरली नसल्याने आणि अन्न, पाण्याच्या शोधात ते मानवी वस्तीत येत आहेत. जंगलामध्येही मानवाने नको तेवढ्या प्रमाणात हस्तक्षेप केल्यानेच हत्तींनी धुमाकूळ घातला असल्याचं विप्लाव हाजरा यांचं म्हणणं आहे.

सौजन्य - www.foxnews.com

टॅग्स :wildlifeवन्यजीवFarmerशेतकरीBengali countryबांग्ला देश