शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतल्या...; बंगळुरूमध्ये 22 जणांवर गुन्हा दाखल, 1.10 लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 1:16 PM

पाण्याचे संकट इतके भीषण आहे की, पिण्याच्या पाण्याच्या इतर वापरावर बंदी घातल्यापासून आतापर्यंत तब्बल 22 जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तर एक लाखांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतातील सिलिकॉन व्हॅली बंगळुरू सध्या भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. राज्यातील 240 पैकी 223 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाण्याचे संकट इतके भीषण आहे की, पिण्याच्या पाण्याच्या इतर वापरावर बंदी घातल्यापासून आतापर्यंत तब्बल 22 जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तर एक लाखांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.

बंगळुरू वॉटर सप्लाय अँड सीवरेज बोर्डाने (BWSSB) मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शहरातील पिण्याचे पाणी वाहन धुण्यासाठी, बागकाम, बांधकाम आणि इतर कारणांसाठी वापरण्यास बंदी घातली होती. बोर्डाचे चेअरमन राम प्रशांत मनोहर सांगतात की, आम्हाला दक्षिण-पूर्व भागातून सर्वाधिक तक्रारी येत होत्या. आम्ही जनतेला पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले असून तसा इशाराही दिला आहे.

1.10 लाख रुपयांचा दंड वसूल

रिपोर्टनुसार, इतर कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरल्याबद्दल बंगळुरूमधील 22 कुटुंबांना प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 1.10 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात होळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही नियम लागू केले होते. बोर्डाने कावेरी नदी किंवा बोअरवेलचे पाणी होळीची पूल पार्टी आयोजित करण्यासाठी वापरू नये असे सांगितले होते.

दररोज पन्नास कोटी लिटर पाण्याची टंचाई

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यापूर्वी म्हटले होते की, बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट सातत्याने वाढत आहे. बंगळुरूला दररोज सुमारे पन्नास कोटी लिटर पाण्याची टंचाई भासत आहे. शहराला दररोज 147 कोटी लिटर पाणी कावेरी नदीतून मिळते तर 65 कोटी लिटर पाणी बोअरवेलमधून येते.

चाळीस वर्षांतील सर्वात मोठ्या जलसंकटाचा सामना

कर्नाटक गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठ्या जलसंकटाचा सामना करत आहे. अलीकडेच, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले होते की, गेल्या 30 ते 40 वर्षांत इतका दुष्काळ आपण पाहिला नाही. यापूर्वीही येथे दुष्काळ पडला आहे. मात्र आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर परिसर दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले नाहीत. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातWaterपाणीBengaluruबेंगळूर