पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपा नेते दिलीप घोष यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आता बंगालमध्ये टीएमसीचा (TMC) अंत होणार असून लवकरच भाजपाचे सरकार सत्तेत येईल असं म्हणत निशाणा साधला. दिलीप घोष यांनी असा दावा केला की, एप्रिलनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं सरकार स्थापन होत आहे आणि ही बाब ममता बॅनर्जी यांनाही समजली आहे. म्हणूनच त्या एकामागून एक बैठका घेत आहेत, पण या बैठकांचा काहीही उपयोग होणार नाही. टीएमसीचं खरं रूप आता जनतेसमोर आलं असून जनता त्यांना सत्तेतून हटवण्यासाठी सज्ज झाली आहे.
दिलीप घोष पुढे म्हणाले की, दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जाणूनबुजून गदारोळ करत आहेत. ममता बॅनर्जी कशा प्रकारे सत्ता चालवत आहेत हे आता संपूर्ण देश पाहत आहे. बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालमध्ये येऊन इथलं वातावरण खराब करत आहेत, ज्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. ममता बॅनर्जींच्या हातातून आता सर्व काही निसटलं आहे. बंगालची सध्याची परिस्थिती काय आहे, हे आज संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. टीएमसीचे नेते फक्त स्वतःचे खिसे भरण्यात मग्न आहेत आणि जनतेच्या समस्या ऐकायला कोणालाही वेळ नाही. लोक जेव्हा तक्रार घेऊन पोलिसांकडे जातात, तेव्हा पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.
सोमवारी ममता बॅनर्जी यांनी नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या (ECI) मुख्यालयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी आयुक्तांवर कडक शब्दांत टीका केली. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी सात वेळा खासदार आणि चार वेळा केंद्रीय मंत्री राहिले आहे, पण मी असा मुख्य निवडणूक आयुक्त कधीच पाहिला नाही. ते अत्यंत अहंकारी आणि खोटे बोलणारे व्यक्ती आहेत."
ममता बॅनर्जी यांनी पुढे सांगितलं की, "मी त्यांना स्पष्टपणे बजावलं आहे की, कोणीही कायमस्वरूपी खुर्चीवर बसून राहू शकत नाही, प्रत्येकाला कधी ना कधी जावंच लागतं." तसेच त्यांनी निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान (IT) विभागाच्या महासंचालिका सीमा खन्ना यांच्यावरही निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील खऱ्या मतदारांची नावे यादीतून हटवण्यात त्यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
Web Summary : BJP's Dilip Ghosh predicts TMC's downfall in Bengal, claiming a BJP government will soon rise. He criticizes Mamata Banerjee's Delhi visits as futile, alleging her government is failing and prioritizing personal gain over public welfare amidst rising concerns about infiltrators.
Web Summary : दिलीप घोष ने बंगाल में टीएमसी के पतन की भविष्यवाणी की, भाजपा सरकार के जल्द आने का दावा किया। उन्होंने ममता बनर्जी की दिल्ली यात्राओं को व्यर्थ बताया, आरोप लगाया कि उनकी सरकार विफल हो रही है और घुसपैठियों के बीच सार्वजनिक कल्याण की बजाय व्यक्तिगत लाभ को प्राथमिकता दे रही है।