शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

कोरोनामुळे बेरोजगार झालेल्यांना सरकारी योजनेचा लाभ; ‘अशाप्रकारे’ अर्ज करुन घ्या फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 9:34 AM

नियमानुसार कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के पगार देण्यात येईल.

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे अनेक जण नोकऱ्या गेल्याने बेरोजगार झालेत. या युवकांसाठी केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. अटल विमा कल्याण योजनेंतर्गत सवलतीत वाढ करण्याच्या निर्णयाला सरकारने अधिसूचित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचा कालावधी सरकारने कालावधी ३० जून २०२१ पर्यंत वाढविला आहे. याचा लाभ कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ESIC) मध्ये नोंदणीकृत कामगारांना ५० टक्के बेरोजगारीचा लाभ मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा ४० लाखाहून अधिक कामगारांना फायदा होणार आहे.

या लोकांना योजनेचा लाभ मिळेल

अटल विमा कल्याण योजनेंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे रोजगार गेले आहेत अशांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा फायदा ESI योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचार्‍यांनाच होतो. म्हणजेच ईएसआयचे योगदान त्यांच्या मासिक पगारामधून वजा केले जाते.

नियमानुसार कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के पगार देण्यात येईल. हा फायदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर दरम्यान ज्यांनी नोकर्‍या गमावल्या आहेत त्यांना होणार आहे. पूर्वी ही योजना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती, परंतु आता त्याचा फायदा जून २०२१ पर्यंत घेता येईल.

हे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

जरी एखाद्या व्यक्तीने ईएसआयसीचा विमा उतरविला असेल, परंतु काही गैरव्यवहारामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले असेल, त्या व्यक्तीविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे किंवा सेवानिवृत्तीच्या तारखेआधी त्या व्यक्तीने सेवानिवृत्ती (VRS) घेतली असेल तर तो / ती या योजनेसाठी पात्र नसेल, त्यांना या योजनेला लाभ घेता येणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी

विमाधारकाने नोकरी सोडण्यापूर्वी किमान २ वर्षे काम केले असावे आणि ईएसआयमध्ये कमीतकमी ७८ दिवस योगदान दिले असावे. नोकरी गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला ३० दिवसांच्या आत दावा करावा लागतो. यासाठी क्लेम फॉर्म थेट ईएसआयसी शाखा कार्यालयात किंवा ऑनलाईन सादर करता येईल. तसेच आपण ईएसआयसीच्या संकेतस्थळाला भेट देऊन अटल विमा कल्याण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म मिळवल्यानंतर १५ दिवसांच्या आत क्लेमची रक्कम विमाधारकाच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड नंबरचा वापर केला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारUnemploymentबेरोजगारी