शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सावध व्हा, येणार थंडीची लाट! उत्तर आणि मध्य भारताला भरणार हुडहुडी, हवामान खात्याने दिला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 08:58 IST

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जानेवारी-फेब्रुवारी-मार्च कालावधीत सामान्य पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गव्हाच्या पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

नवी दिल्ली : नव्या वर्षाचे नागरिकांनी माेठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, उत्तर भारतातील अनेक भागात नव्या वर्षाचा पहिलाच दिवस गेल्या चार वर्षांतील गारेगार ठरला. उत्तर भारतातील अनेक 

राज्यांना थंडीमुळे हुडीहुडी भरली आहे. विशेषत: पंजाब, हरयाणा या भागात तापमान घसरले आहे. जम्मू- काश्मिरसह, हिमाचल प्रदेशात पर्यटक हिवाळ्याचा आनंद लुटत असल्याचे चित्र आहे. तथापि, मध्य भारतात जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी थंड हवामान होते. पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये किमान ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पहाटे दोन्ही राज्यांमध्ये काही ठिकाणी धुकेही दिसून आले. 

जानेवारीमध्ये पारा घसरणार - भारतीय हवामान खात्याने देशाच्या मध्यवर्ती भागात जानेवारीत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारताच्या काही भागात दाट धुके राहण्याचा देखील अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जानेवारी-फेब्रुवारी-मार्च कालावधीत सामान्य पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गव्हाच्या पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

तापमान शून्याच्या खाली, तरीही नववर्षाचा जल्लाेषश्रीनगरमध्ये शून्यापेक्षा कमी तापमान असूनही, शेकडो स्थानिक लोक व पर्यटकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाल चौकातील प्रतिष्ठित क्लॉक टॉवरवर गर्दी केली होती, असे दृश्य यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. स्थानिक लोक आणि पर्यटकांनी नववर्षाचा आनंद लुटला.

कुठे किती अंशांपर्यंत उतरला पारा?फरीदकोटमध्ये ८ अंश सेल्सिअस, लुधियानामध्ये ८.२ अंश सेल्सिअस आणि अमृतसरमध्ये ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हरयाणातील कर्नाल येथे ८.१ अंश सेल्सिअस तर हिस्सार, नारनौल आणि भिवानी येथे अनुक्रमे ८.३, ८.८ आणि ८.३ अंश सेल्सिअस तापमान हाेते.

गेले वर्ष १२२ वर्षांतील सर्वात उष्ण- महापात्रा म्हणाले की, २०२३ हे १९०१ नंतरचे दुसरे सर्वात उष्ण वर्ष होते. कारण देशातील वार्षिक सरासरी तापमान सामान्यपेक्षा ०.६५ अंश सेल्सिअस जास्त होते. १९०१ नंतरचे सर्वात उष्ण वर्ष २०१६ नाेंदविले होते. - तेव्हा देशातील वार्षिक सरासरी हवेचे तापमान सामान्यपेक्षा ०.७१ अंश सेल्सिअस जास्त होते. देशाच्या बहुतांश भागांमध्ये सकाळी तुलनेने उष्णतेची अपेक्षा आहे. - मध्य आणि वायव्य भागांमध्ये थंड दिवसांचा अनुभव येईल. कारण हवामान विभागाने या प्रदेशात सामान्य कमाल तापमानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  

टॅग्स :weatherहवामान