शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावध व्हा, येणार थंडीची लाट! उत्तर आणि मध्य भारताला भरणार हुडहुडी, हवामान खात्याने दिला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 08:58 IST

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जानेवारी-फेब्रुवारी-मार्च कालावधीत सामान्य पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गव्हाच्या पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

नवी दिल्ली : नव्या वर्षाचे नागरिकांनी माेठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, उत्तर भारतातील अनेक भागात नव्या वर्षाचा पहिलाच दिवस गेल्या चार वर्षांतील गारेगार ठरला. उत्तर भारतातील अनेक 

राज्यांना थंडीमुळे हुडीहुडी भरली आहे. विशेषत: पंजाब, हरयाणा या भागात तापमान घसरले आहे. जम्मू- काश्मिरसह, हिमाचल प्रदेशात पर्यटक हिवाळ्याचा आनंद लुटत असल्याचे चित्र आहे. तथापि, मध्य भारतात जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी थंड हवामान होते. पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये किमान ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पहाटे दोन्ही राज्यांमध्ये काही ठिकाणी धुकेही दिसून आले. 

जानेवारीमध्ये पारा घसरणार - भारतीय हवामान खात्याने देशाच्या मध्यवर्ती भागात जानेवारीत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारताच्या काही भागात दाट धुके राहण्याचा देखील अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जानेवारी-फेब्रुवारी-मार्च कालावधीत सामान्य पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गव्हाच्या पिकाच्या चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

तापमान शून्याच्या खाली, तरीही नववर्षाचा जल्लाेषश्रीनगरमध्ये शून्यापेक्षा कमी तापमान असूनही, शेकडो स्थानिक लोक व पर्यटकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाल चौकातील प्रतिष्ठित क्लॉक टॉवरवर गर्दी केली होती, असे दृश्य यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. स्थानिक लोक आणि पर्यटकांनी नववर्षाचा आनंद लुटला.

कुठे किती अंशांपर्यंत उतरला पारा?फरीदकोटमध्ये ८ अंश सेल्सिअस, लुधियानामध्ये ८.२ अंश सेल्सिअस आणि अमृतसरमध्ये ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दोन्ही राज्यांची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हरयाणातील कर्नाल येथे ८.१ अंश सेल्सिअस तर हिस्सार, नारनौल आणि भिवानी येथे अनुक्रमे ८.३, ८.८ आणि ८.३ अंश सेल्सिअस तापमान हाेते.

गेले वर्ष १२२ वर्षांतील सर्वात उष्ण- महापात्रा म्हणाले की, २०२३ हे १९०१ नंतरचे दुसरे सर्वात उष्ण वर्ष होते. कारण देशातील वार्षिक सरासरी तापमान सामान्यपेक्षा ०.६५ अंश सेल्सिअस जास्त होते. १९०१ नंतरचे सर्वात उष्ण वर्ष २०१६ नाेंदविले होते. - तेव्हा देशातील वार्षिक सरासरी हवेचे तापमान सामान्यपेक्षा ०.७१ अंश सेल्सिअस जास्त होते. देशाच्या बहुतांश भागांमध्ये सकाळी तुलनेने उष्णतेची अपेक्षा आहे. - मध्य आणि वायव्य भागांमध्ये थंड दिवसांचा अनुभव येईल. कारण हवामान विभागाने या प्रदेशात सामान्य कमाल तापमानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  

टॅग्स :weatherहवामान