शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

भयंकर! मास्क लावला नसल्याने पोलिसांनी मुलाच्या हातापायात ठोकला खिळा; महिलेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 20:03 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : मास्क न लावणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,71,57,795 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,08,921 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,157 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,11,388 लोकांना आपला गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. अनेक ठिकाणी मास्क न वापरल्यास दंड भरावा लागत आहे. कोरोनाच्या संकटात मास्क हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

मास्क न लावणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलाने मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी मुलाच्या हातापायात खिळे ठोकल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरातली ही घटना आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मास्क लावला नाही म्हणून तीन पोलीस आले आणि आपल्या मुलाला घेऊन गेले. अनेक तास शोधल्यानंतर हा मुलगा जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकले होते. बरेलीमधल्या बरादरी भागातली ही घटना आहे. 

महिलेने आणि तिच्या कुटुंबाने याप्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी या मुलाला अटक करण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्याची आणि आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. मुलाच्या आईने पोलिसांवर हे आरोप केलेले असतानाच अधिकाऱ्यांनी मुलगा खोटं सांगत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास देखील सुरू असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मी जिवंत आहे... हे सिद्ध करण्यासाठी 'त्याला' करावी लागतेय धडपड; माराव्या लागताहेत कार्यालयाच्या चकरा

एका व्यक्तीला आपणं जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. अशोक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कारण सरकारी कागदपत्रांवर त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे. शिवकुमार अहिरवार असं या व्यक्तीचं नाव असून तो गेल्या दोन महिन्यांपासून अधिकाऱ्यांकडे जाऊन आपण जिवंत असल्याचं वारंवार सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचं काम करणाऱ्या शिवकुमारने 2018 साली राज्य सरकारच्या मुख्यमंत्री जन कल्याण संबल योजनेत आपले नाव नोंदवले होते. या योजनेद्वारा सरकार असंघटित क्षेत्राच्या उन्नतीसाठी आर्थिक मदत करते. या योजनेद्वारा मुलांच्या पालन-पोषणासाठी, मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य करते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतPoliceपोलिसBiharबिहार