शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बँकांची थकीत कर्जे झाली कमी; पण आर्थिक घोटाळे मात्र वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 03:47 IST

तीन वर्षांत वाढले फसवणुकीचे प्रकार

नवी दिल्ली : वर्षभरात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण कमी झाले असून, ३० सप्टेंबरअखेर या बँकांच्या थकीत कर्जांची रक्कम ७.२७ लाख रुपये आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

शेड्युल्ड व्यापारी बँका तसेच वित्तीय संस्थांमध्ये तब्बल १ लाख १३ हजार ३७४ कोटी रुपयांचे घोटाळे झाले असल्याची माहिती आहे, असेही अनुराग ठाकूर यांनी नमूद केले. थकीत कर्जांच्या वसुलीसाठी बँकांनी जोरदार मोहीम राबवली असून, नादारी व दिवाळखोरी कायद्यामुळे कर्जांच्या वसुलीला वेग आला आहे, असा दावाही त्यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केला.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ३१ मार्च २0१५ अखेर थकीत कर्जे २,७९,०१६ कोटी रुपये इतकी होती. ती थकीत कर्जांची रक्कम पुढील वर्षी, ३१ मार्च २०१७ पर्यंत ६,८४,७३२ कोटी रुपयांवर गेली आणि ३१ मार्च २०१८ अखेर हीच रक्कम ८,९५,६०१ कोटींवर गेली, ही माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

ठाकूर म्हणाले की, ३० सप्टेंबर २०१९ अखेर ही कर्जे ७ लाख २७ हजार २९६ कोटी रुपयांवर आली आहेत. म्हणजेच थकीत कर्जांची रक्कम १ लाख ६८ हजार ३0५ कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

शेड्युल्ड व्यापारी बँका आणि वित्तीय संस्था यांमध्ये मात्र घोटाळे वाढले आहेत, असे सांगून ते म्हणाले की, हॅकिंग, सायबर हल्ले, डाटा चोरी आणि बनावट कर्जे यांची संख्या सातत्याने वाढत असून, त्यातून हे घोटाळे झाले आहेत आणि अनेक खातेदारांची फसवणूकही झाली आहे. गेल्या तीन वर्षांत अशा घोटाळ्यांची संख्या आणि त्यातील रक्कम यात वाढ होत आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या माहितीतून स्पष्ट होते.

टॅग्स :BJPभाजपाfraudधोकेबाजीbankबँकIndiaभारत