शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 16:48 IST

बांगलादेशमध्ये सत्तांत्तर झाल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये नोकरीतील आरक्षणामुळे सुरू असलेल्या तणावामुळे शेख हसीना यांनी राजीनामा दिला. यानंतर बांगलादेशात सत्तांत्तर झाले. शेख हसीना अजूनही भारतातच वास्तव्यास आहेत, त्यांच्याविरोधात बांगलादेशात गुन्हे  दाखल आहेत. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशने प्रयत्न सुरू केले आहेत. 

शेख हसीना यांच्याबाबत बांगलादेशकडून सातत्याने वक्तृत्व केले जात आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कायदा मंत्री आसिफ नजरुल यांनी शुक्रवारी सांगितले की, जर भारताने शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर त्याचा तीव्र विरोध केला जाईल.

२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने गुरुवारी शेख हसीना यांच्याविरुद्ध मानवाधिकार उल्लंघनाच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी केले. शेख हसीना यांना १८ नोव्हेंबरपर्यंत हजर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. यानंतर कायदामंत्र्यांनी ही टिप्पणी केली.

नजरुल म्हणाले की, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आमच्याकडे अनेक कायदेशीर व्यवस्था आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रत्यार्पण करार आधीच आहे. भारत इतर नियमांचा हवाला देऊन नकार देऊ शकतो, पण प्रामाणिकपणे आणि कायद्यानुसार पाहिले तर भारत शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्यास बांधील आहेत.

शेख हसीना यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले तेव्हा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव त्या तेथे उपस्थित आहेत. शेख हसीना ५ ऑगस्ट रोजी आपली मुलगी रोझी यांच्यासोबत भारतात पोहोचल्या आणि तेव्हापासून त्या येथे अज्ञात ठिकाणी राहत आहेत. त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट बांगलादेश सरकारने रद्द केला आहे.

शेख हसीना यांना भारतात आश्रय दिल्यामुळे बांगलादेशाने भारताविरोधात टीका करण्यास सुरुवात केली आहे. अंतरिम सरकारमधील परराष्ट्र मंत्री तौहीद हुसैन यांनी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की, शेख हसीना यांना बांगलादेशला परत पाठवायचे की नाही याचा निर्णय भारत घेईल. याशिवाय आणखी एका नेत्याने सांगितले की, भारताने शेख हसीना यांना आश्रय देणे म्हणजे गुन्हेगारांना आश्रय देण्यासारखे आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश