शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

त्रिपुरा सरकार बांगलादेशला अंधारात ठेवणार? 200 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:01 IST

बांगलादेश थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यास त्रिपुरा सरकार वीजपुरवठा बंद करेल का? असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी अद्याप असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले.

बांगलादेशाकडेत्रिपुराचे 200 कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. यासंदर्भात त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी माहिती दिली. तसेच, शेजारील बांगलादेशाचावीजपुरवठा बंद करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही माणिक साहा यांनी सांगितले. 

दरम्यान, एनटीपीसी इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे त्रिपुरा राज्य इलेक्ट्रिसिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड बांगलादेशाला 60-70 मेगावॅट वीज पुरवठा करते. यासाठी बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डासोबत करार करण्यात आला आहे. 

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत माणिक साहा म्हणाले, "बांगलादेशने आम्हाला वीज पुरवठ्यासाठी जवळपस 200 कोटी रुपये दिलेले नाहीत. थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. आम्हाला आशा आहे की, ते त्यांची थकबाकी भरतील जेणेकरून वीजपुरवठा खंडित होणार नाही."

याचबरोबर, बांगलादेश थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यास त्रिपुरा सरकार वीजपुरवठा बंद करेल का? असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी अद्याप असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, त्रिपुरामध्ये वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी अनेक यंत्रसामग्री बांगलादेशातून किंवा चितगाव बंदरातून आणण्यात आली होती. अशा परिस्थितीत कृतज्ञता म्हणून त्रिपुरा सरकारने करारानंतर देशात वीजपुरवठा सुरू केला. मात्र, बांगलादेशने थकबाकी भरली नाही, तर आम्ही किती काळ वीजपुरवठा सुरू ठेवू, हे मला माहित येत नाही, असे माणिक साहा म्हणाले. 

टॅग्स :electricityवीजTripuraत्रिपुराBangladeshबांगलादेश