शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
4
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
5
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
6
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
7
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
8
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
9
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
11
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
12
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
14
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
15
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
16
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
17
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
18
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
19
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
20
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना

बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 10:48 IST

Bangladesh News: गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिघडत आहेत. बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनूस हे सातत्याने भारतविरोधी कारवायांना बळ देणारी पावलं उचलत आहेत.

गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिघडत आहेत. बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनूस हे सातत्याने भारतविरोधी कारवायांना बळ देणारी पावलं उचलत आहेत. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्याचदरम्यान, आता बांगलादेशमधील मोहम्मद युनूस सरकारने असं काही पाऊल उचललं आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीब उर रहमान आणि तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात झालेला एक करार मोडीत काढला आहे. 

यासंदर्भात समोर येत असलेल्या वृत्तानुसार बांगलादेश दक्षिण त्रिपुरामधील मुहुरी नदीजवळ एक धरण बांधत आहे. हे धरण १.५ किलोमीटर लांब आणि २० फूट उंच आहे.   या धरणामुळे भारताच्या हद्दीतील भूभागाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच बांगलादेशने उचललेल्या या पावलामुळे स्थानिक लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या भागातील स्थानिक आमदार दीपांकर सेन यांनी याबाबत आवाज उठवला असून, केंद्रीय गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करून तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे. दीपांकर सेन यांनी सांगितले की, बांगलादेशच्या स्थापनेच्या वेळी मुजीब उर रहमान आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात एक करार झाला होता. या करारानुसार सीमारेषेवर झीरो लाईनपासून १५० यार्ड अंतरामध्ये कुठलंही बांधकाम होणार नाही, असं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र बांगलादेशकडून आता उभारण्यात येत असलेलं धरण हे सीमेवरील झीरो लाईनपासून केवळ ५० यार्ड अंतरावर आहे. अनेक ठिकाणी हे अंतर केवळ १० यार्ड एवढंच आहे.

याआधी त्रिपुरामधील असे प्रकल्प केवळ इंदिरा गांधी आणि मुजीब यांच्यातील त्या करारामुळे रद्द करण्यात आले होते. मात्र आता बांगलादेशकडून जाणीवपूर्वक या धरणांचं बांधकाम केलं जात आहे, असा आरोप सेन यांनी केला. 

दक्षिण त्रिपुराचे पोलीस आयुक्त सी. सेन यांनी सांगितले की, बांगलादेस या प्रकल्पावर वेगाने काम करत आहे. तसेच ज्या ठिकाणी हे धरण बांधले जात आहे, त्या भागातील नेताजी सुभाषचंद्रनगर येथे ५०० हून अधिक कुटुंबांचं वास्तव्य आहे.  

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशTripuraत्रिपुराDamधरण