शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 10:48 IST

Bangladesh News: गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिघडत आहेत. बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनूस हे सातत्याने भारतविरोधी कारवायांना बळ देणारी पावलं उचलत आहेत.

गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिघडत आहेत. बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनूस हे सातत्याने भारतविरोधी कारवायांना बळ देणारी पावलं उचलत आहेत. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर सातत्याने हल्ले होत आहेत. त्याचदरम्यान, आता बांगलादेशमधील मोहम्मद युनूस सरकारने असं काही पाऊल उचललं आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीब उर रहमान आणि तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात झालेला एक करार मोडीत काढला आहे. 

यासंदर्भात समोर येत असलेल्या वृत्तानुसार बांगलादेश दक्षिण त्रिपुरामधील मुहुरी नदीजवळ एक धरण बांधत आहे. हे धरण १.५ किलोमीटर लांब आणि २० फूट उंच आहे.   या धरणामुळे भारताच्या हद्दीतील भूभागाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच बांगलादेशने उचललेल्या या पावलामुळे स्थानिक लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या भागातील स्थानिक आमदार दीपांकर सेन यांनी याबाबत आवाज उठवला असून, केंद्रीय गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करून तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे. दीपांकर सेन यांनी सांगितले की, बांगलादेशच्या स्थापनेच्या वेळी मुजीब उर रहमान आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात एक करार झाला होता. या करारानुसार सीमारेषेवर झीरो लाईनपासून १५० यार्ड अंतरामध्ये कुठलंही बांधकाम होणार नाही, असं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र बांगलादेशकडून आता उभारण्यात येत असलेलं धरण हे सीमेवरील झीरो लाईनपासून केवळ ५० यार्ड अंतरावर आहे. अनेक ठिकाणी हे अंतर केवळ १० यार्ड एवढंच आहे.

याआधी त्रिपुरामधील असे प्रकल्प केवळ इंदिरा गांधी आणि मुजीब यांच्यातील त्या करारामुळे रद्द करण्यात आले होते. मात्र आता बांगलादेशकडून जाणीवपूर्वक या धरणांचं बांधकाम केलं जात आहे, असा आरोप सेन यांनी केला. 

दक्षिण त्रिपुराचे पोलीस आयुक्त सी. सेन यांनी सांगितले की, बांगलादेस या प्रकल्पावर वेगाने काम करत आहे. तसेच ज्या ठिकाणी हे धरण बांधले जात आहे, त्या भागातील नेताजी सुभाषचंद्रनगर येथे ५०० हून अधिक कुटुंबांचं वास्तव्य आहे.  

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशTripuraत्रिपुराDamधरण