शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
2
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
3
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
4
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
5
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
6
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
7
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
8
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
9
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
10
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
11
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
12
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
13
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
14
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
15
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
16
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
17
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
18
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
19
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
20
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...

बंडखोरांची पहिली पसंती 'भाजप', 2014 पासून 211 आमदार-खासदार भाजपमध्ये सामील, काँग्रेसला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 13:42 IST

एडीआरच्या अहवालातील आकडेवारीनुसार, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

जनता दलाचे (युनायटेड) प्रमुख नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्यानंतर आठवड्याभरात शुक्रवारी मणिपूरमधील पक्षाच्या सहा आमदारांपैकी पाच आमदारांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 2014 पासून पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदार आणि खासदारांची संख्या 211 वर पोहोचली आहे. मणिपूरमधील एकमेव जनता दलाचे (यू) आमदार जे भाजपमध्ये सामील झाले नाहीत, ते लिलाँगचे आमदार मोहम्मद नसीर आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मणिपूरमधील 60 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या आणि विधानसभेत नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) चाही पाठिंबा आहे. आता जनता दलाचे (यू) पाच आमदारही भाजपमध्ये सामील झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात भाजपसोबतची युती तोडल्याचा परिणाम म्हणून मणिपूरमधील या राजकीय घडामोडीकडे पाहिले जात आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालाच्या विश्लेषणातून असे समोर आले आहे की, 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून 2022 पर्यंत 211 आमदार आणि खासदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. दुसरीकडे, या काळात 60 आमदार आणि खासदार भाजपमधून बाहेर पडले आहेत. विरोधी पक्ष भाजपवर आपली 'संसाधने', प्रलोभने आणि सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप करत आहेत.

मणिपूरमधील अलीकडच्या राजकीय घडामोडींनंतर जनता दलाने (यू) भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने आमदारांना जनता दला(यू) पासून वेगळे करण्यासाठी आपल्या संसाधनांचा वापर केला आहे, असा आरोप जनता दलाने (यू) केला आहे. दरम्यान, जनता दला (यू)सह विरोधी पक्ष आपल्या आमदारांना चांगली वागणूक देत नाही, असा आरोप भाजपने केला आहे.

काँग्रेसला सर्वात मोठा धक्काएडीआरच्या अहवालातील आकडेवारीनुसार, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. 2014 ते 2021 पर्यंत ही संख्या 177 आहे आणि या वर्षी गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी आणखी 20  यामध्ये सामील झाले आहेत. त्यापैकी 84 जण भाजपमध्ये दाखल झाले आहेत, त्यापैकी 2021 पर्यंत 76 आणि यंदा जवळपास 8 नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणcongressकाँग्रेस