शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 11:34 IST

शेकडो मजूर व शेतकऱ्यांची खाती गावातील बँकेतच आहेत. सरकारी योजनांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात येतो. त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम अचानक गायब झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथील बँकेत ग्रामस्थ, शेतकरी आणि मजुरांनी गोंधळ घातला. त्यांच्या खात्यातील मजुरीचे पैसे, कर्जाचे पैसे, किसान सन्मान निधी आणि पेन्शनचे पैसे अचानक गायब झाल्याचं त्यांनी सांगितलं. बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक करून पैसे काढले आहेत. याठिकाणी सुमारे ३०० ते ४०० पोहोचले होते, त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.

जसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडरिया गाव ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या शेकडो मजूर व शेतकऱ्यांची खाती गावातील बँकेतच आहेत. सरकारी योजनांचा पैसा थेट त्यांच्या खात्यात येतो. त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम अचानक गायब झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यांचे पैसे फसवणूक करून इतर लोकांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. 

बँक व्यवस्थापक व बांदा येथील अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली, मात्र कोणतीही सुनावणी होऊ शकली नाही. यानंतर त्यांनी बँकेबाहेर निदर्शने करत पैशांची मागणी केली. सुनावणी झाली नाही, तेव्हा जलशक्ती राज्यमंत्री रामकेश निषाद यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली, त्यावर मंत्र्यांनी तातडीने डीएम, एसपी आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक रामराज मीना यांनी ग्रामस्थांनी केलेले आरोप खोटे व निराधार असल्याचं सांगितलं. ज्या लोकांच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्या सर्वांना बँक स्टेटमेंट काढून देण्यात आलं आहे.  पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जलशक्ती राज्यमंत्री रामकेश निषाद म्हणाले की, आज गडरिया गावातील रहिवासी आणि शेतकरी आले होते. गावातील बँकेत खातं उघडून त्यांनी कष्टाचे पैसे जमा केले होते. त्यांच्या खात्यातून फसवणूक करून पैसे काढण्यात आले असून त्यांचे ट्रान्जेक्शन इतर खात्यांमध्ये झाल्याची या सर्वांची तक्रार आहे.

या प्रकरणी डीएम, एसपी आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. चौकशीनंतर मला कळवा आणि कारवाई करा, असं मी म्हटलं आहे. ३०० ते ४०० लोकांचा तपशील देण्यात आला आहे, जे बँकेचं पासबुक घेऊन आले होते असं रामकेश निषाद यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशbankबँकMONEYपैसा