शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ निवडणूक लढण्यास बंदी घाला

By admin | Updated: October 21, 2014 03:34 IST

राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल म्हणून ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यांच्या खटल्यात न्यायालयाकडून आरोप निश्चित केले गेले

नवी दिल्ली : राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल म्हणून ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यांच्या खटल्यात न्यायालयाकडून आरोप निश्चित केले गेले आहेत, अशा व्यक्तींना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने केला आहे.दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यात दोषी ठरताच लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व संपुष्टात येऊन तो भविष्यातही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिला होता. तेच सूत्र पकडून निर्वाचित लोकप्रतिनिधींना जो निकष तोच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनाही लागू व्हावा या दृष्टीने निवडणूक आयोगाने हा प्रस्तावकेला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, सिद्ध झाल्यास ज्यासाठी किमान पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते अशा फौजदारी गुन्ह्यांच्या खटल्यात ज्यांच्यावर, नियोजित निवडणुकीपूर्वी किमान सहा महिने आधी, सक्षम न्यायालयाने आरोप निश्चित केले असतील अशा व्यक्तींना निवडणूक लढविण्यास मनाई करावी, असा प्रस्ताव आयोगाने केला आहे.निवडणुकीच्या तोंडावर प्रतिस्पर्ध्यावर राजकीय हेतूने प्रेरित असे खटले दाखल करून त्यास अपात्र ठरविणे शक्य होऊ नये यासाठी या प्रस्तावात निवडणुकीपूर्वी सहा महिन्यांची कालमर्यादा प्रस्तावित करण्यात आली आहे, असेही संपत म्हणाले.निवडणूक प्रक्रियेतील धन आणि बळाच्या वापराचा प्रभाव कमी करण्यासह एकूणच निवडणूक सुधारणांसाठी काय करता येईल यावर विधी आयोग सध्या विचार करीत आहे. त्यामुळे आयोगाने केलेला हा नवा प्रस्तावही विधी आणि न्याय मंत्रालयाने तपासून पाहण्यासाठी विधी आयोगाकडे पाठविला असल्याचे संपत म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)