शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

दहशतवाद पसरवणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी आणा; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 11:46 IST

नाणार, आरे आंदोलकांबाबत सरकारने घेतलेले निर्णयाने आनंद झाला

नवी दिल्ली - राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर अनेक मागण्यांना जोर येऊ लागला आहे. अशातच सनातन संस्थेबाबतही सरकारने भूमिका घ्यावी, दहशतवाद पसरविण्याचं काम सनातन करते. मालेगाव दंगलीत सर्व पुरावे असताना प्रज्ञा ठाकूरला भाजपाने खासदार केले हे अतिशय वाईट बाब आहे. दहशतवाद पसरविणारा कोणत्याही समाजाचा असो त्याला शिक्षा व्हायला हवी. सनातन संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी हुसेन दलवाई यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

याबाबत बोलताना हुसेन दलवाई एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, नाणार, आरे आंदोलकांबाबत सरकारने घेतलेले निर्णयाने आनंद झाला. भीमा-कोरेगाव प्रकरणात काही जणांना गोवण्याचे काम सुरु आहे. त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे या दोघांचा सहभाग भीमा-कोरेगावमध्ये होता. त्यांच्यामुळेच दंगली घडल्या. सांगलीच्या दंगलीवेळी जंयत पाटील यांनी भिडेंची बाजू घेतली होती. त्यामुळे मी जयंत पाटलांनी भिडेंची बाजू घेऊ नये असं सांगणार आहे. भिडे-एकबोटे यांना अद्दल घडविली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच  शिवसेनेने सनातन धर्म संस्थेला कधी पाठिंबा दिला नाही. महाराष्ट्रात शांतता ठेवायची असेल तर अशा लोकांवर कारवाई घ्यायला हवी. काँग्रेस काळात अंमलबजावणी झाली नाही ती आमची चूक होती. महाराष्ट्रात पुरोगामी सरकार आलेले आहे. आता याबाबत स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. दाभोलकर, पानसरे यांच्यासारखी माणसं मारली जातात, त्याच्यामागे कोण सूत्रधार आहे ते शोधून काढलं पाहिजे. सनातन संस्थेचे जे लोक बोलतात त्यावरुन हे स्पष्ट होतंय, सरकार नक्की या संबंधात विचार करतील असा विश्वास काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला. 

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanatan Sansthaसनातन संस्थाHussein Dalwaiहुसेन दलवाई