शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

Video: काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा भाजपा आणि संघावर मोठा आरोप; म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 11:34 IST

मध्य प्रदेशातील भिंड येथे माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी दावा केला आहे

भिंड - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी देशातील मुस्लिमांपेक्षा गैर मुस्लीम लोक हेरगिरी करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपा, बजरंग दल अशा संघटना ISI कडून पैसे घेतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मध्य प्रदेशातील भिंड येथे माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी दावा केला आहे की, जितकेही लोक पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना सापडतात ते लोक बजरंग दल, भाजपा आणि आरएसएसकडून पैसे घेतात. आयएसआयकडून हेरगिरी करण्यासाठी मुस्लीम कमी पण इतर लोक जास्त आहेत हे समजून घ्यावं असं त्यांनी सांगितले. 

आम्हाला देशभक्ती शिकवू नकाभाजपावर खोटा देशभक्तीचा आरोप लावत दिग्विजय सिंह म्हणाले की, आमच्या विचारधारेची लढाई भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही ते आम्हाला देशभक्तीचे धडे देत आहेत. 1947 च्या पूर्वी हे लोक कुठे होते? जेव्हा इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले तेव्हा हे लोक कुठे होते? त्यामुळे आम्हाला देशभक्ती शिकवू नका असा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपाला लगावला आहे. 

मागील वर्षी दिग्विजय सिंह यांनी हिंदू दहशतवादाचा मुद्दा घेत भाजपावर निशाणा साधला होता. हिंदू धर्मातील दहशतवादी संघाशी जोडले गेले आहेत. हिंदू दहशतवादी आरएसएसच्या विचारसरणीतून येतात. द्वेषाची विचारधारा संघाकडून पसरविली जाते. जितके हिंदू दहशतवादी पकडले गेले ते संघाचे कार्यकर्ते आहेत. नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधींना मारले होते ते देखील आरएसएस विचारधारेचे होते असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता. 

तसेच संघ अन् भाजपाचे लोक जमावाला हिंसेसाठी भडकावतात. देशात हिंसा होण्याची दोन कारणं आहेत. लोकांना वेळेवर न्याय मिळत नाही, त्यामुळे लोक भडकलेले असतात. तर दुसरं कारण हे भाजपा आणि आरएसएसचे लोक आहेत. आरएसएसचे कार्यकर्ते जमावाला हिंसेसाठी भडकावतात असा दावाही दिग्विजय सिंह यांनी केला होता.  

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPakistanपाकिस्तानBJPभाजपाISIआयएसआय