शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“सनातन धर्माचा अपमान केला जातोय, त्या सर्वांना २०२४ ला मोक्ष मिळेल”: बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 11:27 IST

Baba Ramdev: सनातन धर्माबाबत केल्या जाणाऱ्या विधानांचा बाबा रामदेव यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

Baba Ramdev: गेल्या काही दिवसांपासून सनातन धर्माबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. डीएमकेचे मंत्री उदयनिधी यांनी सुरुवातीला सनातन धर्माबाबत काही विधाने केली आणि त्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात आली. या विधानांवर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. यानंतर बिहारच्या एका मंत्र्यांनी रामचरितमानसाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. रामचरितमानस याची तुलना पोटॅशियम सायनाइडशी केली. यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या वादात आता योगगुरू बाबा रामदेव यांनी उडी घेतल्याचे दिसत आहे. 

बिहारचे मंत्री चंद्रशेखर यादव यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. त्यांनी रामचरितमानसची तुलना घातक पोटॅशियम सायनाइडशी केली. पंचावन्न प्रकारचे डिशेस सर्व्ह केल्यानंतर त्यात पोटॅशियम सायनाइड मिसळले तर काय होईल, हिंदू धर्मग्रंथांचीही स्थिती अशीच आहे. रामचरितमानसबद्दल माझा आक्षेप आहे आणि तो आयुष्यभर कायम राहील, असे चंद्रशेखर यादव यांनी सांगितले. चंद्रशेखर यांनी या धार्मिक ग्रंथाचे वर्णन समाजात फूट पाडणारे आहे, असे सांगत पैगंबर मोहम्मद हे मर्यादा पुरुषोत्तम असल्याचे चंद्रशेखर म्हणाले होते. याबाबत बाबा रामदेव यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 

सनातन धर्माचा अपमान केला जातोय, त्या सर्वांना २०२४ ला मोक्ष मिळेल

गेल्या काही दिवसांपासून सनातन धर्माचा अपमान करणारी विधाने केली जात आहेत. सनातन धर्माला शिव्या-शाप दिले जात आहेत. या सर्वांना २०२४ मध्ये मोक्ष मिळेल, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. काशी येथे बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, सनातन धर्माचे मर्म काशीत आहे. काशी ही शाश्वत नगरी आहे. अनादी आणि अनंताची उपासना करण्याचे हे एक उत्तम तीर्थक्षेत्र आहे. हे ज्ञान आणि मोक्षाचे शहर आहे. त्यात युगानुयुगे देवत्व होते. पंतप्रधान मोदींनी याची भव्यता वाढवली, असे कौतुकोद्गार बाबा रामदेव यांनी काढले. 

दरम्यान, काशी हे आता ते संपूर्ण जगाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. काशी हे भारतीय सांस्कृतिक वारसा असलेले हे महातीर्थ आहे. हेल्थ टुरिझम, धार्मिक आणि अध्यात्मिक पर्यटनासाठी काशी जगभरात आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ज्ञान पर्यटन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक पर्यटन हे सनातन धर्माचे सार आहे, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले. 

 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाUttar Pradeshउत्तर प्रदेश