शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus : जर मुलांना ताप आला असेल तर पालकांनी सावध राहावं, सरकारचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 10:29 IST

CoronaVirus : देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आयुष मंत्रालयाने मुलांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

नवी दिल्ली : देशात आता कोरोनाव्हायरस संसर्गाची प्रकरणे  सातत्याने कमी होत आहेत. सध्या देशातील बर्‍याच राज्यांमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे. मात्र, लवकरच देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आयुष मंत्रालयाने मुलांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 

यानुसार, जर मुलांना 4 ते 5 दिवसापर्यंत जास्त ताप येत असेल, जेवण कमी करत असतील किंवा थकल्यासारखे वाटत असेल तर लोकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मुलांमधील ऑक्सिजनची पातळी जरी 95 च्या खाली गेली असली तरी त्यांना वृद्धांपासून दूर ठेवले पाहिजे. कोरोना लक्षणे नसलेली मुले वृद्ध लोकांसाठी समस्या निर्माण करु शकतात. 

मार्गदर्शक सूचनांनुसार, मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना दुधात हळद मिसळून दिले पाहिजे. यासह त्यांना च्यवनप्राश द्या. आयुष बाल क्वाथ देऊ शकता. लक्षणांनुसार कोरोना बाधित मुलांनाही विविध आयुर्वेदिक औषधे दिली जाऊ शकतात. मात्र, यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे बंधनकारक आहे. मुलांमध्ये पोषण वाढविण्यासाठी, त्यांना हिरव्या भाज्या आणि फळे खाण्यास द्या.

ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मुलांना पिण्यास कोमट पाणी द्या. मुलांना निरोगी ठेवण्यासाठी, त्यांना सकाळी आणि रात्री दात घासणे (ब्रश करणे) आवश्यक आहे. जर मुल पाच वर्षांपेक्षा मोठे असेल तर त्याला कोमट पाण्याने गुळण्या केल्या पाहिजे. तसेच, तेलाने मुलांची मालिश करा आणि आपल्या मुलांना योगा करण्यास सांगा. 

आयुष मंत्रालयाने या मार्गदर्शक सूचनांमध्ये इशारा दिला आहे की, लठ्ठपणा, टाइप -१ मधुमेह, हृदय, फुफ्फुसे आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त मुलांना कोरोना साथीच्या तिसर्‍या लाटेचा सर्वाधिक धोका असू शकतो. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या