शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रेल्वे अपघात टाळण्यासाठी लाल शर्ट काढून 'तो' ट्रॅकवर धावत सुटला, प्रसंगावधानामुळे वाचला अनेकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 14:18 IST

फारुखाबादच्या या तरुणाने प्रसंगावधान दाखवलं नसंत तर रेल्वे अपघात होऊन अनेक निष्पाल लोकांचा बळी गेला असता. रेल्वे रुळ तुटला असल्याचं लक्षात येताच तरुणाने आपल्या दिशेने येत असलेल्या रेल्वेकडे धाव घेतली आणि रोखण्याचा प्रयत्न केला.

आग्रा, दि. 8 - तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा रेल्वे अपघात टळला. फारुखाबादच्या या तरुणाने प्रसंगावधान दाखवलं नसंत तर रेल्वे अपघात होऊन अनेक निष्पाल लोकांचा बळी गेला असता. रेल्वे रुळ तुटला असल्याचं लक्षात येताच तरुणाने आपल्या दिशेने येत असलेल्या रेल्वेकडे धाव घेतली आणि रोखण्याचा प्रयत्न केला. तरुणाने आपल्या अंगातील लाल शर्ट काढून एका काठीला बांधला आणि ट्रॅकवर उभा राहिला. सकाळी आठ वाजता कालिंदी एक्स्प्रेस कानपूर सेंट्रलच्या दिशेने जात होती. फारुखाबादपासून दोन किमी अंतरावर श्यामनगर येथे सुदैवाने ही दुर्घटना टळली. 

ही दुर्घटना टाळत कौतुकास्पद कामगिरी करणा-या या तरुणाचं नाव पवन कुमार असं आहे. जोपर्यंत ट्रेनचा वेग कमी झाला नाही तोपर्यंत आपल्या हातातील लाल शर्ट तो फडकावत होता. ट्रॅक तुटला होता तेथून काही अंतरावर रेल्वे थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. 

पवन याने सांगितलं की, 'मी जवळच्या मंदिरात जात होतो, तेव्हा दोन मुलांनी येऊन मला ट्रॅक तुटला असल्याचं सांगितलं. त्यावेळी ट्रेन येणार होती. मी लगेच ट्रॅकच्या दिशेने धाव घेतली तेव्हा ट्रेन वेगाने येत असल्याचं पाहिलं. मी हात हलवत वेग कमी करण्याचा इशारा दिला पण मोटरमनने वेग कमी केला नाही. म्हणून मग नंतर मी माझा लाल शर्ट काढून हवेत फडकावला. यानंतर शेवटी ट्रेन थांबवण्यात आली'. यानंतर स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन रेल्वे ट्रॅकची पाहणी केली. 

याचदिवशी दिल्लीमधील मिंटो ब्रीजजवळ रांची - राजधानी एक्स्प्रेस ट्रॅकवरुन उतरली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. याआधी काही तासांपुर्वी उत्तर प्रदेशात शक्तिपुंज एक्स्पेसचे सात डबे रुळावरुन घसरले होते. या दोन्ही दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं. 

फक्त एका महिन्यात चार दुर्घटनाफक्त एका महिन्यात चार रेल्वे अपघात झाले आहेत. गुरुवारी दोन रेल्वेंचा अपघात झाला होता. हे अपघात अशावेळी झाले आहेत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सुरेश प्रभू यांच्या जागी पियूष गोयल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रीपद दिलं आहे. पाच दिवसांत दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला होता. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी