शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघात टाळण्यासाठी लाल शर्ट काढून 'तो' ट्रॅकवर धावत सुटला, प्रसंगावधानामुळे वाचला अनेकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 14:18 IST

फारुखाबादच्या या तरुणाने प्रसंगावधान दाखवलं नसंत तर रेल्वे अपघात होऊन अनेक निष्पाल लोकांचा बळी गेला असता. रेल्वे रुळ तुटला असल्याचं लक्षात येताच तरुणाने आपल्या दिशेने येत असलेल्या रेल्वेकडे धाव घेतली आणि रोखण्याचा प्रयत्न केला.

आग्रा, दि. 8 - तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा रेल्वे अपघात टळला. फारुखाबादच्या या तरुणाने प्रसंगावधान दाखवलं नसंत तर रेल्वे अपघात होऊन अनेक निष्पाल लोकांचा बळी गेला असता. रेल्वे रुळ तुटला असल्याचं लक्षात येताच तरुणाने आपल्या दिशेने येत असलेल्या रेल्वेकडे धाव घेतली आणि रोखण्याचा प्रयत्न केला. तरुणाने आपल्या अंगातील लाल शर्ट काढून एका काठीला बांधला आणि ट्रॅकवर उभा राहिला. सकाळी आठ वाजता कालिंदी एक्स्प्रेस कानपूर सेंट्रलच्या दिशेने जात होती. फारुखाबादपासून दोन किमी अंतरावर श्यामनगर येथे सुदैवाने ही दुर्घटना टळली. 

ही दुर्घटना टाळत कौतुकास्पद कामगिरी करणा-या या तरुणाचं नाव पवन कुमार असं आहे. जोपर्यंत ट्रेनचा वेग कमी झाला नाही तोपर्यंत आपल्या हातातील लाल शर्ट तो फडकावत होता. ट्रॅक तुटला होता तेथून काही अंतरावर रेल्वे थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. 

पवन याने सांगितलं की, 'मी जवळच्या मंदिरात जात होतो, तेव्हा दोन मुलांनी येऊन मला ट्रॅक तुटला असल्याचं सांगितलं. त्यावेळी ट्रेन येणार होती. मी लगेच ट्रॅकच्या दिशेने धाव घेतली तेव्हा ट्रेन वेगाने येत असल्याचं पाहिलं. मी हात हलवत वेग कमी करण्याचा इशारा दिला पण मोटरमनने वेग कमी केला नाही. म्हणून मग नंतर मी माझा लाल शर्ट काढून हवेत फडकावला. यानंतर शेवटी ट्रेन थांबवण्यात आली'. यानंतर स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन रेल्वे ट्रॅकची पाहणी केली. 

याचदिवशी दिल्लीमधील मिंटो ब्रीजजवळ रांची - राजधानी एक्स्प्रेस ट्रॅकवरुन उतरली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. याआधी काही तासांपुर्वी उत्तर प्रदेशात शक्तिपुंज एक्स्पेसचे सात डबे रुळावरुन घसरले होते. या दोन्ही दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं. 

फक्त एका महिन्यात चार दुर्घटनाफक्त एका महिन्यात चार रेल्वे अपघात झाले आहेत. गुरुवारी दोन रेल्वेंचा अपघात झाला होता. हे अपघात अशावेळी झाले आहेत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सुरेश प्रभू यांच्या जागी पियूष गोयल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रीपद दिलं आहे. पाच दिवसांत दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला होता. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी