शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

रेल्वे अपघात टाळण्यासाठी लाल शर्ट काढून 'तो' ट्रॅकवर धावत सुटला, प्रसंगावधानामुळे वाचला अनेकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 14:18 IST

फारुखाबादच्या या तरुणाने प्रसंगावधान दाखवलं नसंत तर रेल्वे अपघात होऊन अनेक निष्पाल लोकांचा बळी गेला असता. रेल्वे रुळ तुटला असल्याचं लक्षात येताच तरुणाने आपल्या दिशेने येत असलेल्या रेल्वेकडे धाव घेतली आणि रोखण्याचा प्रयत्न केला.

आग्रा, दि. 8 - तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा रेल्वे अपघात टळला. फारुखाबादच्या या तरुणाने प्रसंगावधान दाखवलं नसंत तर रेल्वे अपघात होऊन अनेक निष्पाल लोकांचा बळी गेला असता. रेल्वे रुळ तुटला असल्याचं लक्षात येताच तरुणाने आपल्या दिशेने येत असलेल्या रेल्वेकडे धाव घेतली आणि रोखण्याचा प्रयत्न केला. तरुणाने आपल्या अंगातील लाल शर्ट काढून एका काठीला बांधला आणि ट्रॅकवर उभा राहिला. सकाळी आठ वाजता कालिंदी एक्स्प्रेस कानपूर सेंट्रलच्या दिशेने जात होती. फारुखाबादपासून दोन किमी अंतरावर श्यामनगर येथे सुदैवाने ही दुर्घटना टळली. 

ही दुर्घटना टाळत कौतुकास्पद कामगिरी करणा-या या तरुणाचं नाव पवन कुमार असं आहे. जोपर्यंत ट्रेनचा वेग कमी झाला नाही तोपर्यंत आपल्या हातातील लाल शर्ट तो फडकावत होता. ट्रॅक तुटला होता तेथून काही अंतरावर रेल्वे थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. 

पवन याने सांगितलं की, 'मी जवळच्या मंदिरात जात होतो, तेव्हा दोन मुलांनी येऊन मला ट्रॅक तुटला असल्याचं सांगितलं. त्यावेळी ट्रेन येणार होती. मी लगेच ट्रॅकच्या दिशेने धाव घेतली तेव्हा ट्रेन वेगाने येत असल्याचं पाहिलं. मी हात हलवत वेग कमी करण्याचा इशारा दिला पण मोटरमनने वेग कमी केला नाही. म्हणून मग नंतर मी माझा लाल शर्ट काढून हवेत फडकावला. यानंतर शेवटी ट्रेन थांबवण्यात आली'. यानंतर स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन रेल्वे ट्रॅकची पाहणी केली. 

याचदिवशी दिल्लीमधील मिंटो ब्रीजजवळ रांची - राजधानी एक्स्प्रेस ट्रॅकवरुन उतरली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. याआधी काही तासांपुर्वी उत्तर प्रदेशात शक्तिपुंज एक्स्पेसचे सात डबे रुळावरुन घसरले होते. या दोन्ही दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचं रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं. 

फक्त एका महिन्यात चार दुर्घटनाफक्त एका महिन्यात चार रेल्वे अपघात झाले आहेत. गुरुवारी दोन रेल्वेंचा अपघात झाला होता. हे अपघात अशावेळी झाले आहेत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सुरेश प्रभू यांच्या जागी पियूष गोयल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्रीपद दिलं आहे. पाच दिवसांत दोन रेल्वे अपघात झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला होता. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी