शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:34 IST

Atul Subhash Suicide Case: पत्नी आणि तिच्या घरच्यांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून अतुल सुभाष यांनी गळफास घेतला.

Atul Subhash Suicide Case: बंगळुरुमधील आयटी इंजिनीअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. पती-पत्नीमधील तणाव कोणत्या थराला पोहोचू शकतो, यावरही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कलम 498(अ) देखील वादाच्या केंद्रस्थानी आहे. अनेकांनी या प्रकरणावर भाष्य केले असून, आता भाजप खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

''या घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. अशा प्रकरणांचा आढावा घेतला पाहिजे. अशा घटनांना तोंड देण्यासाठी स्वतंत्र संस्था असावी. अतुल सुभाष यांचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. लग्नासारख्या गोष्टीला लोकांनी धंदा बनवले, तर हे निषेधार्ह आहे. तरुणांवर अशा प्रकारचा भार टाकू नये. त्यांनी दबावाखाली येवून हे पाऊल उचलले आहे," अशी प्रतिक्रिया कंगना राणौत यांनी दिली.

कोण आहे अतुल सुभाष, काय आहे प्रकरण?अतुल सुभाष नावाच्या आयटी इंजिनीअरने दोन दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अतुल जौनपूर, यूपीचा रहिवासी असून, सध्या बंगळुरुमध्ये नोकरी करायचा. अतुल सुभाषने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींवर पैशांसाठी त्रास दिलाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. आत्महत्येपूर्वी अतुलने 24 पानी सुसाईड नोटही लिहिली आहे. यातून त्याने आपल्यावरल होणाऱ्या मानसिक अत्याचाराचा लेखाजोखा मांडला आहे.

काय आहे कलम 498(अ)?भारतीय दंड संहिताच्या कलम '498 अ' मध्ये एखाद्या महिलेवर तिचा पती किंवा त्याच्या घरच्यांनी केलेल्या अत्याचारासाठी शिक्षेची तरतूद आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्यसभा खासदार ममन कुमार मिश्रा म्हणतात, "सर्वांना माहितीये की, सध्या '498अ'चा गैरवापर होत आहे. या कायद्याद्वारे पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला जातो."

"या कायद्यातील तरतुदींमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. या कायद्याला जामीनपात्र करायला पाहिजे. घरात किरकोळ भांडण झाले की, महिला 498 (अ) नुसार गुन्हा दाखल करतात. काही महिलांनी याचा गैरवापर सुरू केल्यामुळे सर्व महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते," असे ममन मिश्रा म्हणाले.

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी