शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:34 IST

Atul Subhash Suicide Case: पत्नी आणि तिच्या घरच्यांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून अतुल सुभाष यांनी गळफास घेतला.

Atul Subhash Suicide Case: बंगळुरुमधील आयटी इंजिनीअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. पती-पत्नीमधील तणाव कोणत्या थराला पोहोचू शकतो, यावरही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कलम 498(अ) देखील वादाच्या केंद्रस्थानी आहे. अनेकांनी या प्रकरणावर भाष्य केले असून, आता भाजप खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

''या घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. अशा प्रकरणांचा आढावा घेतला पाहिजे. अशा घटनांना तोंड देण्यासाठी स्वतंत्र संस्था असावी. अतुल सुभाष यांचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. लग्नासारख्या गोष्टीला लोकांनी धंदा बनवले, तर हे निषेधार्ह आहे. तरुणांवर अशा प्रकारचा भार टाकू नये. त्यांनी दबावाखाली येवून हे पाऊल उचलले आहे," अशी प्रतिक्रिया कंगना राणौत यांनी दिली.

कोण आहे अतुल सुभाष, काय आहे प्रकरण?अतुल सुभाष नावाच्या आयटी इंजिनीअरने दोन दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अतुल जौनपूर, यूपीचा रहिवासी असून, सध्या बंगळुरुमध्ये नोकरी करायचा. अतुल सुभाषने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींवर पैशांसाठी त्रास दिलाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. आत्महत्येपूर्वी अतुलने 24 पानी सुसाईड नोटही लिहिली आहे. यातून त्याने आपल्यावरल होणाऱ्या मानसिक अत्याचाराचा लेखाजोखा मांडला आहे.

काय आहे कलम 498(अ)?भारतीय दंड संहिताच्या कलम '498 अ' मध्ये एखाद्या महिलेवर तिचा पती किंवा त्याच्या घरच्यांनी केलेल्या अत्याचारासाठी शिक्षेची तरतूद आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्यसभा खासदार ममन कुमार मिश्रा म्हणतात, "सर्वांना माहितीये की, सध्या '498अ'चा गैरवापर होत आहे. या कायद्याद्वारे पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला जातो."

"या कायद्यातील तरतुदींमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. या कायद्याला जामीनपात्र करायला पाहिजे. घरात किरकोळ भांडण झाले की, महिला 498 (अ) नुसार गुन्हा दाखल करतात. काही महिलांनी याचा गैरवापर सुरू केल्यामुळे सर्व महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते," असे ममन मिश्रा म्हणाले.

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी