शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 17:34 IST

Atul Subhash Suicide Case: पत्नी आणि तिच्या घरच्यांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून अतुल सुभाष यांनी गळफास घेतला.

Atul Subhash Suicide Case: बंगळुरुमधील आयटी इंजिनीअर अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. पती-पत्नीमधील तणाव कोणत्या थराला पोहोचू शकतो, यावरही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कलम 498(अ) देखील वादाच्या केंद्रस्थानी आहे. अनेकांनी या प्रकरणावर भाष्य केले असून, आता भाजप खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

''या घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. अशा प्रकरणांचा आढावा घेतला पाहिजे. अशा घटनांना तोंड देण्यासाठी स्वतंत्र संस्था असावी. अतुल सुभाष यांचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. लग्नासारख्या गोष्टीला लोकांनी धंदा बनवले, तर हे निषेधार्ह आहे. तरुणांवर अशा प्रकारचा भार टाकू नये. त्यांनी दबावाखाली येवून हे पाऊल उचलले आहे," अशी प्रतिक्रिया कंगना राणौत यांनी दिली.

कोण आहे अतुल सुभाष, काय आहे प्रकरण?अतुल सुभाष नावाच्या आयटी इंजिनीअरने दोन दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अतुल जौनपूर, यूपीचा रहिवासी असून, सध्या बंगळुरुमध्ये नोकरी करायचा. अतुल सुभाषने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींवर पैशांसाठी त्रास दिलाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. आत्महत्येपूर्वी अतुलने 24 पानी सुसाईड नोटही लिहिली आहे. यातून त्याने आपल्यावरल होणाऱ्या मानसिक अत्याचाराचा लेखाजोखा मांडला आहे.

काय आहे कलम 498(अ)?भारतीय दंड संहिताच्या कलम '498 अ' मध्ये एखाद्या महिलेवर तिचा पती किंवा त्याच्या घरच्यांनी केलेल्या अत्याचारासाठी शिक्षेची तरतूद आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्यसभा खासदार ममन कुमार मिश्रा म्हणतात, "सर्वांना माहितीये की, सध्या '498अ'चा गैरवापर होत आहे. या कायद्याद्वारे पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला जातो."

"या कायद्यातील तरतुदींमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. या कायद्याला जामीनपात्र करायला पाहिजे. घरात किरकोळ भांडण झाले की, महिला 498 (अ) नुसार गुन्हा दाखल करतात. काही महिलांनी याचा गैरवापर सुरू केल्यामुळे सर्व महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते," असे ममन मिश्रा म्हणाले.

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी