शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

‘लोकशाहीवरचा हल्ला भारतासाठी सर्वांत मोठा धोका’; कोलंबियात राहुल गांधींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:54 IST

लोकशाहीवरचा हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कोलंबियाच्या मेडेलिन शहरातील ईआयएए विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.

कोलंबिया : लोकशाहीवरचा हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कोलंबियाच्या मेडेलिन शहरातील ईआयएए विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. भारतामध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही प्रणाली ही प्रत्येकाला आपले स्थान देते. पण, सध्या या लोकशाही व्यवस्थेवर सर्व बाजूंनी हल्ला होत आहे, अशीही टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, सध्या भारतात लोकशाही व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. विविध परंपरांना फुलण्यास वाव देणे भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे. आपण चीनप्रमाणे लोकांना दडपून ठेवू शकत नाही. हुकूमशाही पद्धतीने देश चालवू शकत नाही. चीनच्या तुलनेत भारताची रचना खूपच गुंतागुंतीची आहे. भारताची ताकद ही चीनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. भारताला आध्यात्मिक परंपरा आणि विचारप्रणाली आहे. परंपरा आणि विचारशैलीच्या बाबतीत भारताकडे जगाला देण्यासारखे खूप काही आहे. मी माझ्या देशाबद्दल खूप आशावादी आहे. भारतामध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. विविध कल्पना, परंपरा आणि धर्म यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी हवी असलेली मोकळीक सध्या देशात फारशी मिळताना दिसत नाही. 

‘देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न’भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची व तेथील लोकशाहीची प्रतिमा मलिन करत आहेत. कधी ते भारतीय राज्यव्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याची भाषा करतात, तर कधी ते लष्कर, न्याययंत्रणा, संविधान, सनातन धर्म यांच्यावर टीका करतात. 

दोन देशांच्या संघर्षाच्या भारताला झळादक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी कोलंबियातील सिनेटचे अध्यक्ष लिडिओ ग्रासिया यांचीही भेट घेतली. कोलंबियाला दिलेली भेट ही त्यांच्या दक्षिण अमेरिकेतील चार देशांच्या दौऱ्याचा एक भाग आहे. भारत चीनचा शेजारी आहे आणि अमेरिकेशीही त्याचे उत्तम संबंध आहेत. या दोन देशांच्या संघर्षाच्या झळा भारतालाही बसतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून ध्रुवीकरणाचे प्रयत्न चालविले आहेत. भारतात अर्थव्यवस्थेची वाढ होऊनही आपण नोकऱ्या निर्माण करू शकत नाही. याचे कारण आपली अर्थव्यवस्था मुख्यतः सेवाक्षेत्रावर आधारित आहे. त्यामुळे भारताला उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Democracy under attack in India, biggest threat: Rahul Gandhi.

Web Summary : Rahul Gandhi in Colombia stated that attacks on democracy pose the biggest threat to India. He emphasized the need to respect diverse traditions, warning against authoritarian approaches like China's. BJP criticizes Rahul for defaming India.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndiaभारत