शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकशाहीवरचा हल्ला भारतासाठी सर्वांत मोठा धोका’; कोलंबियात राहुल गांधींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:54 IST

लोकशाहीवरचा हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कोलंबियाच्या मेडेलिन शहरातील ईआयएए विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.

कोलंबिया : लोकशाहीवरचा हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कोलंबियाच्या मेडेलिन शहरातील ईआयएए विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. भारतामध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही प्रणाली ही प्रत्येकाला आपले स्थान देते. पण, सध्या या लोकशाही व्यवस्थेवर सर्व बाजूंनी हल्ला होत आहे, अशीही टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, सध्या भारतात लोकशाही व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. विविध परंपरांना फुलण्यास वाव देणे भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे. आपण चीनप्रमाणे लोकांना दडपून ठेवू शकत नाही. हुकूमशाही पद्धतीने देश चालवू शकत नाही. चीनच्या तुलनेत भारताची रचना खूपच गुंतागुंतीची आहे. भारताची ताकद ही चीनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. भारताला आध्यात्मिक परंपरा आणि विचारप्रणाली आहे. परंपरा आणि विचारशैलीच्या बाबतीत भारताकडे जगाला देण्यासारखे खूप काही आहे. मी माझ्या देशाबद्दल खूप आशावादी आहे. भारतामध्ये अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. विविध कल्पना, परंपरा आणि धर्म यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी हवी असलेली मोकळीक सध्या देशात फारशी मिळताना दिसत नाही. 

‘देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न’भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची व तेथील लोकशाहीची प्रतिमा मलिन करत आहेत. कधी ते भारतीय राज्यव्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याची भाषा करतात, तर कधी ते लष्कर, न्याययंत्रणा, संविधान, सनातन धर्म यांच्यावर टीका करतात. 

दोन देशांच्या संघर्षाच्या भारताला झळादक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी कोलंबियातील सिनेटचे अध्यक्ष लिडिओ ग्रासिया यांचीही भेट घेतली. कोलंबियाला दिलेली भेट ही त्यांच्या दक्षिण अमेरिकेतील चार देशांच्या दौऱ्याचा एक भाग आहे. भारत चीनचा शेजारी आहे आणि अमेरिकेशीही त्याचे उत्तम संबंध आहेत. या दोन देशांच्या संघर्षाच्या झळा भारतालाही बसतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून ध्रुवीकरणाचे प्रयत्न चालविले आहेत. भारतात अर्थव्यवस्थेची वाढ होऊनही आपण नोकऱ्या निर्माण करू शकत नाही. याचे कारण आपली अर्थव्यवस्था मुख्यतः सेवाक्षेत्रावर आधारित आहे. त्यामुळे भारताला उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Democracy under attack in India, biggest threat: Rahul Gandhi.

Web Summary : Rahul Gandhi in Colombia stated that attacks on democracy pose the biggest threat to India. He emphasized the need to respect diverse traditions, warning against authoritarian approaches like China's. BJP criticizes Rahul for defaming India.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndiaभारत