शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी यांचा छळ एटीएसने केलाच नाही, मानवी हक्क आयोगानं केलं स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 12:22 IST

साध्वी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात असताना साध्वी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर लावलेले मानसिक छळाचे आरोप खोटे असल्याचं मानवी हक्क आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावरुन देशभरात वादंग निर्माण झालेलं आहे. साध्वी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात असताना साध्वी यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर लावलेले मानसिक छळाचे आरोप खोटे असल्याचं मानवी हक्क आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्या सांगण्यावरून तुरुंगामध्ये माझा छळ केला जात होता असा आरोप भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. 

मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह तुरुंगात होत्या. यावेळी तत्कालीन एटीएसप्रमुख असलेले हेमंत करकरे यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी माझ्यावर 9 वर्ष मानसिक आणि शारीरिक छळ केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानेही साध्वी प्रज्ञा सिंह यांचे आरोप अनेकदा फेटाळून लावले होते. साध्वी यांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आर.एस खैरे यांच्या नेतृत्वाखाली मानवी हक्क आयोगाची समिती स्थापन करण्यात आली होती. 2014-15 मध्ये या समितीने केलेल्या चौकशीत साध्वी यांचे आरोप खोटे ठरले. प्रज्ञा सिंह यांनी मानसिक आणि शारीरिक छळाचा जो आरोप लावला होता त्याचे कोणतेही पुरावे आणि साक्ष उपलब्ध होऊ शकले नाहीत असं मानवी हक्क आयोगाने दिलेल्या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले. 

मानवी हक्क आयोगाच्या या समितीत सीआयडी अधिकारी जे. एम कुलकर्णी, दक्षता समितीच्या सदस्या रश्मी जोशी आणि पोलिस दलातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. 2015 साली या समितीने दिलेल्या अहवालात कुठेही साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं होतं. या समितीच्या अहवालाच्या चार वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही साध्वी यांचे आरोप फेटाळून लावले होते. 2008 मध्ये दोन रुग्णालयात केलेल्या तपासणीमध्ये साध्वी यांच्या शरिरावर कुठेही जखम का सापडली नाही? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यानंतर साध्वी यांना कोर्टासमोर उपस्थित केले तेव्हाही साध्वी यांनी या प्रश्नावर मौन बाळगलं असल्याची नोंद सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.   

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाAnti Terrorist Squadएटीएस