शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:11 IST

आपच्या नेत्या आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी आरोप केला आहे.

आपच्या नेत्या आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी आरोप केला आहे की, भीषण उष्णता आणि दिल्ली लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा हरियाणाचं सरकार राष्ट्रीय राजधानीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. 25 मे पर्यंत भाजपा नवनवीन कारस्थान रचण्याचा प्रयत्न करत राहील, असं आतिशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

दिल्लीला होणारा पाणीपुरवठा कमी किंवा बंद करू नये, यासाठी आम्ही हरियाणा सरकारला पत्र लिहिणार आहोत. गरज पडल्यास दिल्लीच्या हिस्स्याचं पाणी मिळवण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेऊ. हरियाणा सरकार यमुनेचे पाणी बंद करत आहे. हरियाणा सरकार दिल्लीचा पाणीपुरवठा वारंवार बंद करत आहे. 11 मेपासून दिल्लीचा पाणीपुरवठा बंद करण्याचे कारस्थान सुरू आहे असं म्हटलं आहे.

दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत सुरू असलेल्या राजकीय युद्धादरम्यान दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी बुधवारी मोठं विधान केलं आहे. दिल्लीतील सातही जागांवर मतदान होण्यापूर्वी भारतीय जनता पक्ष नवं षड्यंत्र रचण्यात व्यस्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 25 मे रोजी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर मतदान होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचं हे नवं षडयंत्र असल्याचा आरोप अतिशी यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामिनातून बाहेर आल्यानंतर भाजपा आणखी अडचणीत आली आहे. दिल्लीतील जनतेने सातही जागांवर भाजपाचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. हा संकेत समजताच ती घाबरली. त्यामुळेच भाजपा अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कट रचण्यात व्यस्त आहे. देशातील तरुण बेरोजगार आहेत. महागाई शिगेला पोहोचली आहे. भाजपा या मुद्द्यावर काहीही बोलण्याचे टाळत आहे असंही सांगितलं.

आतिशी यांनी 21 मे रोजी सांगितले होतं की, 4 जून नंतर देशात इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल. त्यानंतर भाजपाचे अनेक नेते आणि ईडीचे अधिकारी इलेक्टोरल बाँड घोटाळा प्रकरणात तुरुंगात जाणार आहेत. अलीकडेच आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, पण त्याच्याशी असहमतही आहोत. 

टॅग्स :AAPआपBJPभाजपाWaterपाणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४