शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Atal Bihari Vajpayee: सोमनाथदांचा रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी एका दिवसात परत दिला तेव्हा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 17:55 IST

आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचा रद्द झालेला पासपोर्ट अलबिहारी वाजपेयी यांनी केवळ एका दिवसात मिळवून दिल्याची आठवण चॅटर्जी यांनी लिहून ठेवली आहे.

नवी दिल्ली- अटलबिहारी वाजपेयी यांच्या अजातशत्रू स्वभावाची प्रचिती सर्वच पक्षांच्या नेत्यांना येत असे. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचा रद्द झालेला पासपोर्ट अलबिहारी वाजपेयी यांनी केवळ एका दिवसात मिळवून दिल्याची आठवण चॅटर्जी यांनी लिहून ठेवली आहे.

किपिंग द फेथ:मेमॉयर्स ऑफ अ पार्लमेंटरियन या चॅटर्जींच्या पुस्तकात त्यांनी लोकसभेतील आपल्या कार्यकाळातील अनेक अनुभव दिले आहेत. आणीबाणीच्या कालावधीमध्ये त्यांच्या पासपोर्टची मुदत संपली होती. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी मागणी केली परंतु त्यांना तो परत मिळालाच नाही. पासपोर्ट मिळविण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रे यांच्याशी संपर्क करुन मदत मागितली. रे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री ओम मेहता यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सांगितले. मात्र ओम मेहता आणि सिद्धार्थ शंकर रे यांची याबाबतीत मदत मिळाली नाही. 

अखेर आणीबाणी संपल्यावर नवे जनता सरकार केंद्रामध्ये सत्तेत आले. आतातरी आपल्याला पासपोर्ट मिळेल असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना पासपोर्ट देण्याची विनंती केली. वाजपेयी यांनी चॅटर्जी यांची समस्या जाणून घेतली आणि त्याच संध्याकाळी चॅटर्जी यांना पासपोर्ट मिळवून दिला. पासपोर्ट मिळाला म्हणजे स्वातंत्र्यच मिळाल्यासारखा आपल्याला आनंद झाला असे चॅटर्जी यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.अर्थात असे असले तरी  सोमनाथ चॅटर्जी यांनी आपल्या राजकीय भूमिकेत कोणतीही तडजोड केली नाही. सर्वच पक्षांच्या सरकारच्या चुका दाखवून देण्यात आणि योग्यवेळी टीका करण्यात ते कधीही मागे राहिले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली रालोआ सरकार सत्तेत आल्यावर अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हाही चॅटर्जी यांनी आपली विरोधी पक्षातील खासदाराची भूमिका व्यवस्थित पार पाडली.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीSomnath Chatterjeeसोमनाथ चॅटर्जीprime ministerपंतप्रधान