शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

'हिंदूचे घर जाळाले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील'; अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर योगी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 22:40 IST

मुख्यमंत्री योगी म्हणाले, 1990 मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचे पाप समाजवादी पक्षाने केले.

जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांचे नुकसान होते. जर हिंदूचे घर जाळाले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल तर मुस्लिमही सुरक्षित असेल. जर हिंदूचे घर सुरक्षित असेल तर मुस्लिमाचे घरही सुरक्षित राहील. आम्ही पाच वर्षांत एकही दंगल होऊ दिली नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 1990 मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचे पाप समाजवादी पक्षाने केले. केवळ 1990 मध्येच नाही तर त्यानंतरही समाजवादी पक्षाला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा कोणालाही सुरक्षित वाटत नव्हते. सपा सरकारच्या काळात राज्य दंगलीच्या आगीत जळत होते. आज आपण म्हणून शकतो, की आम्ही राज्य दंगलमुक्त केले.

अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी म्हणाले, भूतकाळातील वैभवाची पुनर्स्थापना करण्याची मोहीम चालवली जात आहे. आपल्याला भारत आणि भारतीयत्वाचा अभिमान वाटावा, याचा हा भाग आहे. आम्ही मथुराही बनवू. ज्यांच्यामध्ये दम असेल, तेच मथुरा बनवतील, असे योगी म्हणाले. 

योगी म्हणाले, काही लोक म्हणत होते, की निकाल आला तर रक्ताच्या नाद्या वाहतील. त्यांनी पाहिले आहे, की आम्ही कशा पद्धतीने भव्य राम मंदिर उभारण्याच्या दिशेने अग्रेसर झालो आहोत. राष्ट्रवाद हा आमचा अजेंडा आहे. राम मंदिर हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भाग आहे. विश्वनाथ धाम आणि कुंभ हेही त्यचाच भाग आहेत. पवित्र भूमी भव्य-दिव्य बनविणे हा आमच्या राष्ट्रवादाचा भाग आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाAyodhyaअयोध्या