शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2021: "जर आपण मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर..."; अस्वस्थ काँग्रेस नेत्यांचं मौन सुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 15:00 IST

यानंतर आता पक्षातील काही नेत्यांनीच काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाच्या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Congress)

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत काँग्रेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करवा लागत आहे. या वेळी काँग्रेसला चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यातही विशेषतः आसाम आणि केरळमध्ये काँग्रेसला मोठी आशा होती. मात्र, आलेले निकाल पाहता काँग्रेसच्या अडचणी कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच चिन्ह दिसत आहेत. आसाम, केरळ, पदुचेरीतील तथा बंगालमधील पराभव केवळ काँग्रेसच नाही, तर राहुल गांधींनाही मोठा झटका आहे. (Assembly Election 2021 Politics voices are getting stronger about the congress rout in elections) 

यानंतर आता पक्षातील काही नेत्यांनीच काँग्रेसच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रवक्ता रागिनी नायक यांनीही एक ट्विट करत पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, ''जर आपण (काँग्रेसी) मोदींच्या पराभवातच आनंद शोधत बसलो, तर आपल्या पराभवावर आत्म-मंथन कसे करणार?''

Assembly election result 2021: बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

माजी काँग्रेस नेते संजय झा यांनीही पक्षाचे प्रदर्शन आणि निवडणूक निकालांसंदर्भात पक्षाच्या भूमिकेवर निराशा व्यक्त केली आहे. झा यांनी ट्विट करत म्हटले आहे, ''माझ्यासाठी सर्वात मोठी निराशा, काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये आत्मसमर्पण आहे. हे स्वीकारले जाऊ शकत नाही. काँग्रेस 2016 मध्ये, 44 जागा आणि 12.25 टक्के मतांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष होता.''

याच बरोबर, वरिष्ठ अधिवक्ता अखिल सिब्बल यांनी ट्विट केले आहे, की ''मला आश्चर्य वाटते, की काँग्रेस भाजपला हरवल्याबद्दल कधीपर्यंत इतरांचेच अभिनंदन करत राहणार...?''

West Bengal result 2021: बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार

पुन्हा काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता -खरे तर रविवारी आलेल्या चार विधानसभा निवडणुकीचे निकाल हे राहुल गांधी आणि काँग्रेससाठी मोठा झटका आहे. यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसमधील असंतुष्ट गटातील नेते काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. केरळमध्येही काँग्रेसला व्यवस्थित पणे एका छताखाली आणण्यास राहुल गांधी अयशस्वी ठरले आहेत. त्याचाही पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूलला बहुमतात आल्याने, आता येणाऱ्या दिवसांत राष्ट्रीय स्थरावर विरोधी पक्षांच्या नेतृत्वात त्यांची दावेदारीही वाढेल. मात्र, राष्ट्रीय स्थरावर काँग्रेसच भाजपला एकमेव पर्याय आहे, असे काँग्रेच्या नेतृत्वाला वाटते. मात्र, आता या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाच्या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा - 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.

विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही -विरोधी पक्षांत मोठ्या चेहऱ्याचा विचार करता, राहुल गांधींशिवाय, सपा प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, कम्यूनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, अशा अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. मात्र, यांपैकी कुणीही भाजपचा थेट सामना करण्यास सक्षम दिसत नाही. अशावेळी केवळ एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ममता बॅनर्जी. ज्या थेट सामन्यात भाजपला पराभूत करताना दिसत आहेत.

west bengal election result 2021: ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार! आता सोनिया गांधी कोणती खेळी खेळणार?

राहुल गांधींना स्थापित करण्यासाठी काय करणार सोनिया गांधी? -सोनिया गांधी या राहुल गांधींना विरोधकांचा मुख्य चेहरा बनविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, ममतांच्या विजयामुळे हे आणखी कठीण होईल असे दिसते. कारण केवळ पश्चिम बंगालच नवहे, तर आसाम, केरळ, पुदुचेरी आणि तामिळनाडूतही विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यांपैकी आसाम, पुदुचेरी आणि केरळमध्येही काँग्रेसला अपयशच आले आहे.

महत्वाचे म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीपासूनच जवळपास प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव होताना दिसत आहे. देशातील अशा राजकीय परिस्थितीत, आता सोनिया गांधी काँग्रेस आणि राहुल गांधींना कशापद्धतीने विरोधी पक्षांचा सर्वमान्य चेहरा बनवून ठेवणार अथवा बनवणार, यासाठी त्या कोणती खेळी खेळणार हेही पाहणे तेवढेच महत्वाचे आहे. 

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१