शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

गेल्या ४ वर्षांत १७० आमदारांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपचा आकडा किती? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 10:39 AM

विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे.

ठळक मुद्देADR च्या अहवालात महत्त्वाची माहिती समोरगेल्या ४ वर्षांत काँग्रेसच्या १७० आमदारांचा पक्षाला रामरामकाही राज्यांमध्ये दलबदलूंमुळे सत्तातर

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि अन्य पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. अशातच कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे. यामुळे कोणत्या पक्षाचा फायदा आणि कोणाचे अधिक नुकसान झाले, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. (assembly election 2021 adr report says 170 mla of congress left the party in last four years) 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या संस्थेकडून यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे चित्र संपूर्ण देशाने पाहिले. गेल्या चार वर्षांत विविध राज्यांमधील निवडणुकीवेळी काँग्रेसच्या शेकडो आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे या ADR रिपोर्टमधून समोर आले आहे. 

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

काँग्रेसला मोठी गळती

सन २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या काळात विविध राज्यांमधील तब्बल १७० आमदारांनी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. तर भाजपच्या केवळ १८ आमदारांनी पक्ष सोडल्याची माहिती समोर आली आहे. याच कालावधीत आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या ४०५ आमदारांपैकी १८२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, २८ आमदार काँग्रेसमध्ये गेले तर २५ आमदार तेलंगण राष्ट्र समितीत गेले, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

दलबदलमुळे सत्तांतर

विशेष म्हणजे गोवा, मध्य प्रदेश, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आमदारांनी अन्य पक्षात प्रवेश केल्यामुळे  तेथील सरकार बदलले. यापैकी गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील सत्ता बदलाची चर्चा देशभर सुरू होती. या रिपोर्टनुसार, सदर कालावधीत पक्ष बदलून राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या १६ खासदारांपैकी १० खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आला आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या केवळ पाच खासदारांनी फारकत घेत अन्य पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या सात राज्यसभा सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, अशी माहिती या रिपोर्टमधून समोर आली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नेते, मंत्री, आमदार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक