शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Assam Meghalaya Border Clash: असाम-मेघालय बॉर्डरवर गोळीबारानंतर हिंसाचार, 6 जणांचा मृत्यू, इंटरनेट बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 16:03 IST

Meghalaya News: या घटनेत मेघालयातील पाच आणि असाममधील एका फॉरेस्ट गॉर्डचा मृत्यू झाला आहे.

Assam Meghalaya Border Clash:आसाम-मेघालय सीमेवर मंगळवारी (22 नोव्हेंबर) सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लाकूड तस्करी करणारा ट्रक थांबवला होता, यानंतर हाणामारी झाली आणि वनरक्षकासह सहा जण ठार झाले. या घटनेनंतर मेघालय सरकारने 7 जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा पुढील 48 तासांसाठी बंद केली आहे.

मेघालयातील पश्चिम जयंतिया हिल्स, पूर्व जयंतिया हिल्स, पूर्व खासी हिल्स, री-भोई, पूर्व पश्चिम खासी हिल्स, पश्चिम खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्समध्ये इंटरनेट बंद केले आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी सांगितले की, या घटनेत मेघालयातील पाच आणि आसाममधील एका वनरक्षकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेघालयचे मुख्यमंत्री काय म्हणालेकॉनराड संगमा म्हणाले की, मेघालय पोलिसांच्या वतीने एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. मी या घटनेबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो असून त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली यांनी पीटीआयला सांगितले की, आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे तीनच्या सुमारास मेघालय सीमेवर ट्रक अडवला होता.

ट्रक न थांबल्याने गोळीबार झालात्यांनी सांगितले की, ट्रक थांबला नाही तेव्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर गोळीबार केला आणि त्याचे टायर पंक्चर केले. चालक, त्याचा एक सहाय्यक आणि अन्य एका व्यक्तीला पकडण्यात आले, तर अन्य एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. अली यांनी सांगितले की, वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी या घटनेची माहिती जिरिकेंडिंग पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी गर्दी जमलीयानंतर घटनास्थळी जमाव जमा झाला आणि अटक केलेल्या लोकांना सोडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जमावाने वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांना घेराव घातला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना गोळीबार करावा लागला. या घटनेत वनविभागाच्या एका होमगार्डचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. वन कर्मचारी विद्यासिंग लेखे यांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :AssamआसामDeathमृत्यू