शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:08 IST

पूरामुळे आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

पूरामुळेआसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. आसाममधीलपूर परिस्थिती आणखी बिकट झाली. पुरामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे या वर्षी पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे. तसेच सिक्कीमसह या प्रदेशातील सात राज्यांमध्ये मृतांची संख्या ४८ च्या आसपास पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मोदींनी मंगळवारी आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी ईशान्येकडील राज्यांमधील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी पूराचा सामना करण्यासाठी तसेच मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना

ईशान्येकडील राज्यांमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे पासून पाऊस आणि पुरात झालेल्या ४८ मृत्यूंपैकी सुमारे १७ जणांचा मृत्यू आसाममध्ये झाला आहे. अरुणाचल प्रदेशात १२, मेघालयात ६, मिझोराममध्ये ५, सिक्कीममध्ये ४, त्रिपुरामध्ये २ आणि नागालँड आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या १०० दिवसांत फक्त मिझोराममध्ये ६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

२१ जिल्ह्यांमध्ये पूर, लाखो लोक बेघर

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) रिपोर्टनुसार, २१ जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसामुळे ६.३३ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. लाखो लोक बेघर झाले आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की २१ जिल्ह्यांतील १५०६ गावांमधील १४,७३९ हेक्टरपेक्षा जास्त पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. आसाममध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्रा आणि इतर सहा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

१०,४७७ घरांचं नुकसान

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे ५६,००० हून अधिक लोकांना फटका बसला आहेत आणि १०,४७७ घरांचं नुकसान झाले आहे. पुरामुळे राजधानी इम्फाळ आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक भागात पूर आला आहे. 

नागालँडमध्ये मुसळधार पाऊस

नागालँडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोहिमा जिल्ह्यातील फेसामा गावात राष्ट्रीय महामार्ग-२ चा ५० मीटरचा भाग वाहून गेला. त्यामुळे नागालँड आणि मणिपूरमधील वाहतुकीच्या मुख्य मार्गाशी संपर्क तुटला. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, मणिपूरला जाणारे १०० हून अधिक मालवाहू ट्रक रविवारपासून रस्त्यावर अडकले आहेत. कारण पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नाही.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssamआसामsikkimसिक्किमNarendra Modiनरेंद्र मोदीAssam Floodआसाम पूरTripuraत्रिपुराArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश