शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:08 IST

पूरामुळे आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

पूरामुळेआसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. आसाममधीलपूर परिस्थिती आणखी बिकट झाली. पुरामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे या वर्षी पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे. तसेच सिक्कीमसह या प्रदेशातील सात राज्यांमध्ये मृतांची संख्या ४८ च्या आसपास पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मोदींनी मंगळवारी आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी ईशान्येकडील राज्यांमधील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी पूराचा सामना करण्यासाठी तसेच मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना

ईशान्येकडील राज्यांमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे पासून पाऊस आणि पुरात झालेल्या ४८ मृत्यूंपैकी सुमारे १७ जणांचा मृत्यू आसाममध्ये झाला आहे. अरुणाचल प्रदेशात १२, मेघालयात ६, मिझोराममध्ये ५, सिक्कीममध्ये ४, त्रिपुरामध्ये २ आणि नागालँड आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या १०० दिवसांत फक्त मिझोराममध्ये ६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

२१ जिल्ह्यांमध्ये पूर, लाखो लोक बेघर

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) रिपोर्टनुसार, २१ जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसामुळे ६.३३ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. लाखो लोक बेघर झाले आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की २१ जिल्ह्यांतील १५०६ गावांमधील १४,७३९ हेक्टरपेक्षा जास्त पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. आसाममध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्रा आणि इतर सहा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

१०,४७७ घरांचं नुकसान

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे ५६,००० हून अधिक लोकांना फटका बसला आहेत आणि १०,४७७ घरांचं नुकसान झाले आहे. पुरामुळे राजधानी इम्फाळ आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक भागात पूर आला आहे. 

नागालँडमध्ये मुसळधार पाऊस

नागालँडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोहिमा जिल्ह्यातील फेसामा गावात राष्ट्रीय महामार्ग-२ चा ५० मीटरचा भाग वाहून गेला. त्यामुळे नागालँड आणि मणिपूरमधील वाहतुकीच्या मुख्य मार्गाशी संपर्क तुटला. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, मणिपूरला जाणारे १०० हून अधिक मालवाहू ट्रक रविवारपासून रस्त्यावर अडकले आहेत. कारण पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नाही.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssamआसामsikkimसिक्किमNarendra Modiनरेंद्र मोदीAssam Floodआसाम पूरTripuraत्रिपुराArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश