शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:08 IST

पूरामुळे आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

पूरामुळेआसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. आसाममधीलपूर परिस्थिती आणखी बिकट झाली. पुरामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे या वर्षी पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे. तसेच सिक्कीमसह या प्रदेशातील सात राज्यांमध्ये मृतांची संख्या ४८ च्या आसपास पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मोदींनी मंगळवारी आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी ईशान्येकडील राज्यांमधील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी पूराचा सामना करण्यासाठी तसेच मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना

ईशान्येकडील राज्यांमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे पासून पाऊस आणि पुरात झालेल्या ४८ मृत्यूंपैकी सुमारे १७ जणांचा मृत्यू आसाममध्ये झाला आहे. अरुणाचल प्रदेशात १२, मेघालयात ६, मिझोराममध्ये ५, सिक्कीममध्ये ४, त्रिपुरामध्ये २ आणि नागालँड आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या १०० दिवसांत फक्त मिझोराममध्ये ६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

२१ जिल्ह्यांमध्ये पूर, लाखो लोक बेघर

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) रिपोर्टनुसार, २१ जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसामुळे ६.३३ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. लाखो लोक बेघर झाले आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की २१ जिल्ह्यांतील १५०६ गावांमधील १४,७३९ हेक्टरपेक्षा जास्त पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. आसाममध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्रा आणि इतर सहा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

१०,४७७ घरांचं नुकसान

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे ५६,००० हून अधिक लोकांना फटका बसला आहेत आणि १०,४७७ घरांचं नुकसान झाले आहे. पुरामुळे राजधानी इम्फाळ आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक भागात पूर आला आहे. 

नागालँडमध्ये मुसळधार पाऊस

नागालँडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोहिमा जिल्ह्यातील फेसामा गावात राष्ट्रीय महामार्ग-२ चा ५० मीटरचा भाग वाहून गेला. त्यामुळे नागालँड आणि मणिपूरमधील वाहतुकीच्या मुख्य मार्गाशी संपर्क तुटला. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, मणिपूरला जाणारे १०० हून अधिक मालवाहू ट्रक रविवारपासून रस्त्यावर अडकले आहेत. कारण पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नाही.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssamआसामsikkimसिक्किमNarendra Modiनरेंद्र मोदीAssam Floodआसाम पूरTripuraत्रिपुराArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश