शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:08 IST

पूरामुळे आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

पूरामुळेआसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांत अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. आसाममधीलपूर परिस्थिती आणखी बिकट झाली. पुरामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे या वर्षी पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे. तसेच सिक्कीमसह या प्रदेशातील सात राज्यांमध्ये मृतांची संख्या ४८ च्या आसपास पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मोदींनी मंगळवारी आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी ईशान्येकडील राज्यांमधील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी पूराचा सामना करण्यासाठी तसेच मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना

ईशान्येकडील राज्यांमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे पासून पाऊस आणि पुरात झालेल्या ४८ मृत्यूंपैकी सुमारे १७ जणांचा मृत्यू आसाममध्ये झाला आहे. अरुणाचल प्रदेशात १२, मेघालयात ६, मिझोराममध्ये ५, सिक्कीममध्ये ४, त्रिपुरामध्ये २ आणि नागालँड आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या १०० दिवसांत फक्त मिझोराममध्ये ६०० हून अधिक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

२१ जिल्ह्यांमध्ये पूर, लाखो लोक बेघर

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) रिपोर्टनुसार, २१ जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसामुळे ६.३३ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. लाखो लोक बेघर झाले आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की २१ जिल्ह्यांतील १५०६ गावांमधील १४,७३९ हेक्टरपेक्षा जास्त पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. आसाममध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्रा आणि इतर सहा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

१०,४७७ घरांचं नुकसान

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे ५६,००० हून अधिक लोकांना फटका बसला आहेत आणि १०,४७७ घरांचं नुकसान झाले आहे. पुरामुळे राजधानी इम्फाळ आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक भागात पूर आला आहे. 

नागालँडमध्ये मुसळधार पाऊस

नागालँडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोहिमा जिल्ह्यातील फेसामा गावात राष्ट्रीय महामार्ग-२ चा ५० मीटरचा भाग वाहून गेला. त्यामुळे नागालँड आणि मणिपूरमधील वाहतुकीच्या मुख्य मार्गाशी संपर्क तुटला. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, मणिपूरला जाणारे १०० हून अधिक मालवाहू ट्रक रविवारपासून रस्त्यावर अडकले आहेत. कारण पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नाही.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssamआसामsikkimसिक्किमNarendra Modiनरेंद्र मोदीAssam Floodआसाम पूरTripuraत्रिपुराArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश