शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

राज्यात मदरसा आणि संस्कृत शाळा बंद होणार, शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 10:49 IST

'राज्य सरकार धार्मिक संस्थांना निधी देऊ शकत नाही. '

गुवाहाटी : आसामध्ये राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व मदरसा आणि संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सुरु असणाऱ्या या  धार्मिक शाळांचे येत्या काही महिन्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. 

राज्य सरकार धार्मिक संस्थांना निधी देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व मदरसा आणि संस्कृत शाळांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांध्ये बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आसामचेशिक्षण मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले. तसेच, स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संघटनांकडून चालविण्यात येणारे मदरसे सुरू राहतील. मात्र, हे नियमांच्या चौकटीत असतील, असेही हेमंत विश्व शर्मा म्हणाले.  

हेमंत विश्व शर्मा म्हणाले, "धार्मिक उद्देशांसाठी धर्म, धार्मिक शास्त्र, अरबी आणि इतर भाषांमध्ये शिकविण्याचे काम सरकारचे नाही. जर स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संघटना आपल्या पैशातून धर्माचे शिक्षण देत असेल, तर त्यामध्ये काहीच अडचण नाही. मात्र, हे सुद्धा नियमांच्या चौकटीत राहून करावे लागणार आहे.", याशिवाय, मदरशांमध्ये जर कुराण शिकविण्यासाठी राज्याचा निधी वापरला जात असेल, तर आपल्याला गीता आणि बायबल सुद्धा शिकवावे लागेल, असे हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, आसाम सरकारच्या मदरसा शिक्षा बोर्डच्या माहितीनुसार, राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणारे एकूण 612 मदरसे आहेत. या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना इस्लामिक शिक्षण यासोबत विविध विषय शिकविले जातात. या मदरशांसोबत सरकारी अनुदानावर चालणाऱ्या जवळपास 101 संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्कृत शाळांमध्ये वैदिक शिक्षणासोबत विविध विषयांचे शिक्षण दिले जाते. 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे

ठाकरे सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती? ताळमेळच लागेना

यंदा अतिरिक्त २२ सुट्ट्या!; पाच दिवस आठवड्याचा असाही फायदा

टॅग्स :AssamआसामEducationशिक्षण