शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मदरसा आणि संस्कृत शाळा बंद होणार, शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 10:49 IST

'राज्य सरकार धार्मिक संस्थांना निधी देऊ शकत नाही. '

गुवाहाटी : आसामध्ये राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व मदरसा आणि संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सुरु असणाऱ्या या  धार्मिक शाळांचे येत्या काही महिन्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. 

राज्य सरकार धार्मिक संस्थांना निधी देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व मदरसा आणि संस्कृत शाळांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांध्ये बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आसामचेशिक्षण मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले. तसेच, स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संघटनांकडून चालविण्यात येणारे मदरसे सुरू राहतील. मात्र, हे नियमांच्या चौकटीत असतील, असेही हेमंत विश्व शर्मा म्हणाले.  

हेमंत विश्व शर्मा म्हणाले, "धार्मिक उद्देशांसाठी धर्म, धार्मिक शास्त्र, अरबी आणि इतर भाषांमध्ये शिकविण्याचे काम सरकारचे नाही. जर स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संघटना आपल्या पैशातून धर्माचे शिक्षण देत असेल, तर त्यामध्ये काहीच अडचण नाही. मात्र, हे सुद्धा नियमांच्या चौकटीत राहून करावे लागणार आहे.", याशिवाय, मदरशांमध्ये जर कुराण शिकविण्यासाठी राज्याचा निधी वापरला जात असेल, तर आपल्याला गीता आणि बायबल सुद्धा शिकवावे लागेल, असे हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, आसाम सरकारच्या मदरसा शिक्षा बोर्डच्या माहितीनुसार, राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणारे एकूण 612 मदरसे आहेत. या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना इस्लामिक शिक्षण यासोबत विविध विषय शिकविले जातात. या मदरशांसोबत सरकारी अनुदानावर चालणाऱ्या जवळपास 101 संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्कृत शाळांमध्ये वैदिक शिक्षणासोबत विविध विषयांचे शिक्षण दिले जाते. 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे

ठाकरे सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती? ताळमेळच लागेना

यंदा अतिरिक्त २२ सुट्ट्या!; पाच दिवस आठवड्याचा असाही फायदा

टॅग्स :AssamआसामEducationशिक्षण