शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Assam Floods : भीषण! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 9 जिल्ह्यांतील 34 हजार लोकांना फटका, 523 गावं पाणीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 18:03 IST

Assam Floods : सध्या 523 गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये 5,842.78 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

आसाममधील अनेक ठिकाणी रात्रभर पडलेल्या पावसानंतर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या नऊ जिल्ह्यांमध्ये 34,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भूतान सरकार आणि भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत राज्याच्या वरच्या भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देखील 'रेड अलर्ट' जारी केला आणि येत्या काही दिवसांत आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार' पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुवाहाटी येथील IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) मंगळवारपासून 24 तासांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे, त्यानंतर बुधवारी 'ऑरेंज अलर्ट' आणि गुरुवारी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

एएसडीएमएच्या दैनंदिन पूर अहवालानुसार, बाक्सा, बारपेटा, दरांग, डिब्रुगढ, कोकराझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये पुरामुळे सुमारे 34,100 लोक प्रभावित झाले आहेत. लखीमपूरला सर्वाधिक फटका बसला आहे, जिथे 22,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. यानंतर डिब्रुगडमध्ये सुमारे 3,900 आणि कोकराझारमध्ये 2,700 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. 

प्रशासन कोकराझारमध्ये एक मदत शिबिर चालवत आहे जिथे 56 लोकांनी आश्रय घेतला आहे आणि चार जिल्ह्यांमध्ये 24 मदत वितरण केंद्र देखील आहे.ASDMA ने म्हटले आहे की सध्या 523 गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये 5,842.78 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. बारपेटा, सोनितपूर, बोंगाईगाव, धुबरी, डिब्रुगड, गोलाघाट, कामरूप, मोरीगाव, नलबारी, शिवसागर आणि उदलगुरी येथे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप झाल्याचे दिसून आले आहे. कछार, दिमा हासाओ आणि करीमगंजमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

 

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस