शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Assam Floods : भीषण! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 9 जिल्ह्यांतील 34 हजार लोकांना फटका, 523 गावं पाणीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 18:03 IST

Assam Floods : सध्या 523 गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये 5,842.78 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

आसाममधील अनेक ठिकाणी रात्रभर पडलेल्या पावसानंतर भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या नऊ जिल्ह्यांमध्ये 34,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भूतान सरकार आणि भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत राज्याच्या वरच्या भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) देखील 'रेड अलर्ट' जारी केला आणि येत्या काही दिवसांत आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार' पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुवाहाटी येथील IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) मंगळवारपासून 24 तासांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे, त्यानंतर बुधवारी 'ऑरेंज अलर्ट' आणि गुरुवारी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

एएसडीएमएच्या दैनंदिन पूर अहवालानुसार, बाक्सा, बारपेटा, दरांग, डिब्रुगढ, कोकराझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये पुरामुळे सुमारे 34,100 लोक प्रभावित झाले आहेत. लखीमपूरला सर्वाधिक फटका बसला आहे, जिथे 22,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. यानंतर डिब्रुगडमध्ये सुमारे 3,900 आणि कोकराझारमध्ये 2,700 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. 

प्रशासन कोकराझारमध्ये एक मदत शिबिर चालवत आहे जिथे 56 लोकांनी आश्रय घेतला आहे आणि चार जिल्ह्यांमध्ये 24 मदत वितरण केंद्र देखील आहे.ASDMA ने म्हटले आहे की सध्या 523 गावे पाण्याखाली आहेत आणि आसाममध्ये 5,842.78 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. बारपेटा, सोनितपूर, बोंगाईगाव, धुबरी, डिब्रुगड, गोलाघाट, कामरूप, मोरीगाव, नलबारी, शिवसागर आणि उदलगुरी येथे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप झाल्याचे दिसून आले आहे. कछार, दिमा हासाओ आणि करीमगंजमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

 

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस