शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Assam floods: आसाम-मेघालयात पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 09:55 IST

Assam floods: मंगळवारपासून बहुतांश भागात पाऊस पडत असल्याने आसामच्या सात जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपुरामुळे एकूण 1,94,916 लोकांना फटका बसला आहे. यामधील धेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तिनसुकिया जिल्ह्यातील जवळपास 9,000 लोकांनी 35 मदत शिबिरांचा आश्रय घेतला आहे.

नवी दिल्ली : आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारपासून बहुतांश भागात पाऊस पडत असल्याने आसामच्या सात जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जिल्ह्यांतील जवळपास दोन लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही अशीच परिस्थिती आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने (एएसडीएमए) दिलेल्या माहितीनुसार, धेमाजी, लखीमपूर, दरंग, नलबारी, गोलपारा, दिब्रूगड आणि तिनसुकिया या 17 भागातील 229 गावांना पुराचा तडाखा बसला आहे. पुरामुळे एकूण 1,94,916 लोकांना फटका बसला आहे. यामधील धेमाजी, लखीमपूर, गोलपारा आणि तिनसुकिया जिल्ह्यातील जवळपास 9,000 लोकांनी 35 मदत शिबिरांचा आश्रय घेतला आहे.

एएसडीएमएने सांगितले की, पुरामुळे जवळपास 1,007 हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे आणि सुमारे 16,500 घरगुती प्राणी आणि कुक्कुटपालनावर परिणाम झाला आहे. राज्यातील बहुतेक नद्या सोनीतपूर आणि नेमाटिघाट (जोरहाट) मधील अनुक्रमे जीया भरली आणि ब्रह्मपुत्र या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.

दरम्यान, सोमवारी अरुणाचल प्रदेशमधील दिबांग घाटी जिल्ह्यातील आरजू गावात भूस्खलन झाल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत नुकसान झाले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार-चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच, लोकांना पूर आणि भूस्खलनापासून वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

आसाम आणि मेघालयात 26 आणि 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करणार्‍या भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील काही दिवस तीन राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

आणखी बातम्या...

ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा

CoronaVirus News : बापरे! रेल्वे प्रवासी खाद्यपदार्थांवर तुटून पडले, पॅकेटसाठी स्टेशनवरच आपापसात भिडले

CoronaVirus News : दुर्दैवी! एकही सुट्टी न घेता केलं अहोरात्र काम पण कोरोना योद्ध्याने गमावला प्राण

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसाम