शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

Assam Flood: आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू, काँग्रेसचा केंद्रावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 16:06 IST

Assam Flood: राज्यातील 1709 गावे पाण्याखाली गेली असून 82503 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत.

Death In Assam Flood: आसाम राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून साडे 7 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 25 लोकांपैकी 20 लोक पुरामुळे तर 5 लोकांचा भूस्खलनात मृत्यू झाला आहे. शेजारील राज्यांनाही पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे. 

काँग्रेसचा केंद्रावर आरोप 

रिपोर्टनुसार, राज्यातील नागाव परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, तेथे 3.5 लाख लोक संकटाचा सामना करत आहेत. सध्या राज्यात 1709 गावे पाण्याखाली गेली असून 82503 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. दरम्यान, या परिस्थितीवरुन काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले आहे. भाजप सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मिळणाऱ्या मदत रकमेपासून आसामला वंचित ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

आसामला निधीपासून वंचित ठेवलेआसाममध्ये काँग्रेस नेते मनजीत महंता यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, एनडीआरएफ अंतर्गत गुजरातला 2021-22 मध्ये एक हजार कोटी रुपये मिळाले, पण आसामला एक पैसाही दिला गेला नाही. भाजपच्या कार्यकाळात 2018-19 आणि 2019-20 या वर्षात केंद्राकडून आसामला काहीही दिले गेले नाही. 2020-21 मध्ये आसामला केवळ 44.37 कोटी रुपये मिळाले, अशी टीका त्यांनी केली. 

रेल्वेनेही गाड्या रद्द केल्या आसाममध्ये संततधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे भारतीय रेल्वेने राज्यातील गाड्या रद्द केल्या आहेत. आसाममध्ये रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वेने जून महिन्यापर्यंत गाड्यांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या लुमडिंग विभागात पाणी साचल्याने आणि दरड कोसळल्यामुळेही हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर या शेजारील राज्यांतील रस्ते आणि रेल्वे मार्ग पूर्णपणे तुटला आहे.

 

टॅग्स :Assamआसामfloodपूरlandslidesभूस्खलनcongressकाँग्रेसBJPभाजपा