शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

'...तर गुन्हा दाखल करू, अटक होईल'; राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावरून CM बिस्वा सरमा यांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:18 IST

माध्यमांसोबत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बस्वा सरमा म्हणाले, "आम्ही म्हटले आहे की, शहरांमधून जाऊ नका. जो कोणता पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याची परवानगी दिली जाईल."

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा नागालँडमधून आता आसाममध्ये पोहोचली आहे. शिवसागर जिल्ह्यातून सुरू होऊन ही यात्रा आसामच्या 17 जिल्ह्यांमधून जाणार आहे. यात गुवाहाटी शहराचाही समावेश करण्यात आला असून, यामुळे राजकारण पेटले आहे. यावर, आपण शहरात प्रवेश करण्याची परवानगी देणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी (18 जानेवारी) स्पष्ट केले.

माध्यमांसोबत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बस्वा सरमा म्हणाले, "आम्ही म्हटले आहे की, शहरांमधून जाऊ नका. जो कोणता पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याची परवानगी दिली जाईल. मात्र शहरातूनच जाण्याचा अट्टहास केला गेला, तर आम्ही पोलीस व्यवस्था लावणार नाही. मी सरळ गुन्हा दाखल करेन आणि निवडणुकीनंतर, अटक करेन. सध्या काही करणार नाही."

पुढे बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “ही न्याय यात्रा नाही, तर मियां यात्रा आहे. जेथे जेथे मुस्लीम आहेत, तेथे तेथे त्यांची ही  यात्रा सुरू आहे.” यावेळी गांधी कुटुंबावर हल्ला चढवताना हिमंता म्हणाले, “माझ्या मते तर देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब हे गांधी कुटुंब आहे. देशात बोफोर्सपासून ते भोपाळ गॅस दुर्घटनेतील आरोपीला पळवण्यापर्यंत सर्वात भ्रष्ट कुटुंब गांधी कुटुंबच आहे. हे केवळ भ्रष्टच नाही, तर डुप्लीकेटही आहे. त्यांच्या तर घराण्याचे नावही गांधी नाही, आपले डुप्लिकेट नाव घेऊन फिरत आहेत.” 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAssamआसामcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी