शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:39 IST

चर्चेदरम्यान सरमा यांनी राज्यात वेगाने बदलणाऱ्या लोकसंख्येवरही चिंता व्यक्त केली...

राज्यातील मतदान हे केवळ सरकारी योजना अथवा आर्थिक मदतीवरच अवलंबून नाही. आसाममध्ये असे अनेक समुदाय आहेत, ज्यांची राजकीय पसंती पैसा अथवा सोयीसुविधांनी बदलत नाही. राज्यात मतदानाचा कल सरकारी योजना अथवा आर्थिक प्रोत्साहनांवर नाही, तर विचारधारेने प्रभावित असतो, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. ते एका खासगी टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात बोलत होते.

"१० हजार रुपये द्या अथवा १ लाख रुपये, कोणताही मुस्लीम...!"यावेळी, आपण बिहारप्रमाणे महिलांना रोख मदत देण्याची योजना आणू शकतात का? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, "आसाममधील काही समुदाय त्यांच्या कामाची प्रशंसा करतात, पण मतदानाच्या वेळी त्यांच्या बाजूने येत नाहीत. राज्यात मतदानाचा कल सरकारी योजना अथवा आर्थिक प्रोत्साहनाने नव्हे, तर विचारधारेने प्रभावित असतो." एवढेच नाही तर, कितीही पैसा द्या, मग १० हजार रुपये द्या अथवा १ लाख रुपये, कोणताही मुस्लीम मतदार आपल्याला त्यांचा उमेदवार म्हणून निवडणार नाही," असेही सरमा यांनी म्हणाले. सरमा पुढे म्हणाले, "कोणत्याही लोकशाहीमध्ये मतदार केवळ फायदा बघून मतदान करत नाहीत. योजना राबवणे ही सरकारची जबाबदारी आहे, पण लाभ घेणारा प्रत्येक नागरिक त्याच सरकारला मत देईल हे मानणे योग्य नाही. आसाममधील अनेक वर्ग त्यांची वैचारिक भूमिका, ओळख आणि राजकीय धारणा याआधारावर मतदान करतात.

वेगाने बदलणाऱ्या लोकसंख्येवरही व्यक्त केली चिंता -चर्चेदरम्यान सरमा यांनी राज्यात वेगाने बदलणाऱ्या लोकसंख्येवरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध स्थलांतरामुळे लोकसंख्येचा समतोल बिघडत आहे. आसाममधील मुस्लीम लोकसंख्या २०२१ मध्ये सुमारे ३८% होती आणि १९६१ पासून दर दशकात ४-५% ची सातत्याने वाढ नोंदवली गेली आहे. २०२७ पर्यंत हे प्रमाण ४०% पर्यंत पोहोचू शकते. हे प्रमाण ५०% हून अधिक झाल्यास राज्याच्या इतर समुदायांची ओळख आणि सांसस्कृतिक वारसा धोक्यात येऊ शकतो, असेही मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे.

आपले अनेक मुस्लीम कुटुंबांशी चांगले संबंध आहेत. पण निवडणुकीच्या वेळी हे सलोख्याचे संबंध मतांमध्ये रूपांतरित होत नाहीत. मुस्लिम मते काँग्रेसकडे गेली तरी भाजप आसाममध्ये आपले राजकीय स्थान टिकवून ठेवण्यास सक्षम आहे, असा विश्वासही सरमा यांनी यावेळी व्यक्त केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Assam CM: Muslim votes not for BJP, regardless of money.

Web Summary : Assam CM Himanta Biswa Sarma stated that Muslim votes are driven by ideology, not money. He expressed concern over the changing population balance due to illegal immigration, potentially threatening Assam's cultural heritage. BJP can win without Muslim votes, he added.
टॅग्स :AssamआसामBJPभाजपाMuslimमुस्लीमVotingमतदान