शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

देशभरात लागू झाला CAA, मात्र आसाममधील हिंदू करताहेत विरोध, असं आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 14:43 IST

Assam CAA Protest: केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) सोमवारी देशभरात लागू केला आहे. या संदर्भातील अधिसूचनाही केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. मात्र केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर या कायद्याला अनेक भागातून विरोध होऊ लागला आहे. सीएएला विरोध करणाऱ्या राज्यांमध्ये आसामचाही समावेश आहे.

केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) सोमवारी देशभरात लागू केला आहे. या संदर्भातील अधिसूचनाही केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. मात्र केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर या कायद्याला अनेक भागातून विरोध होऊ लागला आहे. सीएएला विरोध करणाऱ्या राज्यांमध्ये आसामचाही समावेश आहे. आसाममधील विरोधी पक्ष आणि प्रादेशिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

सीएएच्या विरोधात आसाम बंदचं आवाहन करणाऱ्या संघटनांना गुवाहाटी पोलिसांनी कायदेशीर नोटिस बजावली आहे. रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासह कुठल्याही सरकारी आणि खाजगी मालमत्तेचं नुकसाान केल्यास किंवा कुठल्याही नागरिकाला दुखापत झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गुवाहाटी पोलिसांनी सांगितले आहे. तसेच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं झालेलं नुकसान आंदोलनकर्त्यांकडून वसूल करण्यात येईल, असंही बजावण्यात आलं आहे.

आसाममधील विरोधी पक्षांनी CAA कायदा लागू केल्याबद्दल भाजपा सरकारचा निषेध केला आहे. राज्यभरात सीएएविरोधात आंदोलन सुरू झालं आहे.  १६ पक्षांचा समावेश असलेल्या संयुक्त विरोधी मंच, आसामने मंगळवारी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने १९७९ मध्ये बेकायदेशीर घुसखोरांची ओळख पटवून त्यांना माघारी धाडण्यासाठी ६ वर्षीय आंदोलनाची सुरुवात केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे आसाममध्ये हिंदूच या कायद्याला विरोध करत आहेत.  आसामची २६३ किमी लांबीची सीमा बांगलादेशला लागून आहे. तिथून आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असते. आसाममध्ये सीएएला विरोध करणाऱ्यांनी सांगितले की, हा कायदा १९८५ मध्ये केंद्र सरकार आणि AASU यांच्यात झालेल्या आसाम करारामधील तरतुदींचं उल्लंघन करतो. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत येथून सीएएला होणाऱा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssamआसामIndiaभारतBangladeshबांगलादेश