शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

गुजरातमध्ये अस्मिता पदयात्रा

By admin | Updated: August 6, 2016 03:51 IST

यापुढे मृत जनावरांची कातडी कमावणार नाही, अत्याचार सहन करणार नाही

अहमदाबाद : यापुढे मृत जनावरांची कातडी कमावणार नाही, अत्याचार सहन करणार नाही, अशा घोषणा देत, उनामध्ये चार दलितांना गोरक्षणाच्या नावाखाली झालेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ गुजरातमधील दलितांनी शुक्रवारपासून अहमदाबादच्या वेजलपूर भागातून पदयात्रा सुरू केली.ही दलित अस्मिता यात्रा १५ आॅगस्ट रोजी उना गावात पोहोचणार आहे. पदयात्रेतील सर्व जण आणि उना गावातील दलित त्या ठिकाणी ध्वजवंदन करून, स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.ही पदयात्रा आज सुरू झाली, तेव्हा त्यात हजारो लाक सहभागी झाले. त्यातील ८00 लोक १0 दिवसांच्या काळात ३५0 किलोमीटर अंतर चालणार असून, मधल्या गावांतील लोकही त्यात सहभागी होणार आहेत. हजारो वर्षांपासूनच्या रूढी आणि परंपरा तोडण्यासाठी जनजागृती करणे हा या अस्मिता यात्रेचा उद्देश आहे. प्रत्येक गावांमध्ये आम्ही सभा घेणार आहोत. यापुढे मृत जनावरांची कातडी काढण्याचे आणि मैला उचलण्याचे, तसेच शौचालयांच्या सफाईचे काम दलितांनी बंद करावे, असे आमचे प्रयत्न असून, त्यासाठी प्रत्येक गावातील दलितांना सांगण्यात येईल, असे या पदयात्रेचे संघटक जीग्नेश मेवाणी यांनी सांगितले.यापुढे आम्ही म्हणजे दलित कोणताही अन्याय आणि अत्याचार सहन करणार नाही, असा इशारा देणे हा आमचा हेतू असून, या निमित्ताने राज्यातील दलितांना आम्ही एकत्र आणणार आहोत. आम्ही आमची परंपरागत कामे यापुढे करणार नसल्याने आम्हाला शेतीसाठी जमीन देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे मेवाणी म्हणाले.माजी आयपीएस अधिकारी राहुल शर्मा यांनी दलित अस्मिता पदयात्रेची कल्पना सुचवली आणि सर्व दलित तसेच पुरोगामी संघटनांनी ती मान्य केली. या यात्रेत राहुल शर्माही सहभागी झाले आहेत. अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचाही त्यात सहभाग आहे. (वृत्तसंस्था)>गीर सोमनाथ जिल्ह्यातील उना गावात ११ जुलै रोजी चार दलितांना बेदम मारहाण करण्यात आली होती. मृत गायीचे कातडे काढण्याचे ते काम करीत होते. पण तुम्हीच गायीला मारले, असा आरोप करीत गोरक्षकांनी त्यांची रस्त्यावरून धिंड काढत मारहाण केली होती. त्यामुळे गुजरातमधील दलितांमध्ये प्रचंड संताप आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात चार दलित तरुणांनी विषप्राशन केले होते. त्यातील एक जण मरण पावल्यामुळे संतापात भरच पडली.>या दोन घटनांनंतर गुजरात सरकारही अडचणीत आले. त्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार असताना दलितांना झालेली मारहाण, त्यांचे सुरू झालेले आंदोलन यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थता आहे.