शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गुजरातमध्ये अस्मिता पदयात्रा

By admin | Updated: August 6, 2016 03:51 IST

यापुढे मृत जनावरांची कातडी कमावणार नाही, अत्याचार सहन करणार नाही

अहमदाबाद : यापुढे मृत जनावरांची कातडी कमावणार नाही, अत्याचार सहन करणार नाही, अशा घोषणा देत, उनामध्ये चार दलितांना गोरक्षणाच्या नावाखाली झालेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ गुजरातमधील दलितांनी शुक्रवारपासून अहमदाबादच्या वेजलपूर भागातून पदयात्रा सुरू केली.ही दलित अस्मिता यात्रा १५ आॅगस्ट रोजी उना गावात पोहोचणार आहे. पदयात्रेतील सर्व जण आणि उना गावातील दलित त्या ठिकाणी ध्वजवंदन करून, स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.ही पदयात्रा आज सुरू झाली, तेव्हा त्यात हजारो लाक सहभागी झाले. त्यातील ८00 लोक १0 दिवसांच्या काळात ३५0 किलोमीटर अंतर चालणार असून, मधल्या गावांतील लोकही त्यात सहभागी होणार आहेत. हजारो वर्षांपासूनच्या रूढी आणि परंपरा तोडण्यासाठी जनजागृती करणे हा या अस्मिता यात्रेचा उद्देश आहे. प्रत्येक गावांमध्ये आम्ही सभा घेणार आहोत. यापुढे मृत जनावरांची कातडी काढण्याचे आणि मैला उचलण्याचे, तसेच शौचालयांच्या सफाईचे काम दलितांनी बंद करावे, असे आमचे प्रयत्न असून, त्यासाठी प्रत्येक गावातील दलितांना सांगण्यात येईल, असे या पदयात्रेचे संघटक जीग्नेश मेवाणी यांनी सांगितले.यापुढे आम्ही म्हणजे दलित कोणताही अन्याय आणि अत्याचार सहन करणार नाही, असा इशारा देणे हा आमचा हेतू असून, या निमित्ताने राज्यातील दलितांना आम्ही एकत्र आणणार आहोत. आम्ही आमची परंपरागत कामे यापुढे करणार नसल्याने आम्हाला शेतीसाठी जमीन देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे मेवाणी म्हणाले.माजी आयपीएस अधिकारी राहुल शर्मा यांनी दलित अस्मिता पदयात्रेची कल्पना सुचवली आणि सर्व दलित तसेच पुरोगामी संघटनांनी ती मान्य केली. या यात्रेत राहुल शर्माही सहभागी झाले आहेत. अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांचाही त्यात सहभाग आहे. (वृत्तसंस्था)>गीर सोमनाथ जिल्ह्यातील उना गावात ११ जुलै रोजी चार दलितांना बेदम मारहाण करण्यात आली होती. मृत गायीचे कातडे काढण्याचे ते काम करीत होते. पण तुम्हीच गायीला मारले, असा आरोप करीत गोरक्षकांनी त्यांची रस्त्यावरून धिंड काढत मारहाण केली होती. त्यामुळे गुजरातमधील दलितांमध्ये प्रचंड संताप आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात चार दलित तरुणांनी विषप्राशन केले होते. त्यातील एक जण मरण पावल्यामुळे संतापात भरच पडली.>या दोन घटनांनंतर गुजरात सरकारही अडचणीत आले. त्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार असताना दलितांना झालेली मारहाण, त्यांचे सुरू झालेले आंदोलन यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थता आहे.