शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुणी 'INDIA' ला तर कुणी 'भारता'ला दिल्या शुभेच्छा; आशिया कपनंतर राजकीय बॅटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 21:35 IST

आशिया चषकात भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final : आशिया चषक 2023 मध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचे खेळाडू 15.2 षटकांत अवघ्या 50 धावावंर ऑलआउट झाले. प्रत्युत्तरात सलामीवीर इशान किशन(23) आणि शुभमन गिल(27) अवग्या 6.1 षटकांत सामना जिंकून दिला. या विजयानंतर भारतीय संघाचे देशभरातून कौतुक होत आहे. पण, या कौतुकात 'भारत विरुद्ध इंडिया' पॅटर्न पाहायला मिळत आहे. 

भारताच्या विजयानंतर काही नेते भारताचे विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत, तर काही नेते इंडियाचे अभिनंदन करत आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी संघाचे अभिनंदन करताना इंडिया शब्दाचा वापर केला. 

सीएम केजरीवालांचे ट्विट

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही टीमचे अभिनंदन करताना INDIA हा शब्द वापरला आहे. 

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांनी मात्र भारत हा शब्द वापरुन भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. 

संघाचे अभिनंदन करण्यासाठी भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान मोदींचा फोटो वापरला आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी 'भारताचे' अभिनंदन केले

काय आहे भारत विरुद्ध इंडियावाद?हा संपूर्ण वाद G-20 च्या डिनरच्या निमंत्रणावरुन सुरू झाला. G-20 शिखर परिषदेच्या डिनरच्या निमंत्रण पत्रिकेवर 'President of India' ऐवजी 'President of Bharat' असे लिहिले होते. निमंत्रण पत्र बाहेर आल्यानंतर मोदी सरकार देशाच्या नावात इंडिया हा शब्द वापरणे बंद करून केवळ भारत म्हणण्याचा डाव आखत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. इंडियाचे नाव बदलून भारत व्हावे, यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

वादाची सुरुवात बंगळुरुपासून विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A नाव दिल्यानंतर हा वाद सुरू झाला. यामुळेच सत्ताधारी पक्ष देशाचे नाव बदलण्याचा कट रचत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. 17-18 जुलै रोजी बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक झाली. 26 विरोधी पक्षांनी भाजप सरकारच्या विरोधात एकत्र येऊन त्यांच्या आघाडीचे नाव इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) असे जाहीर केले होते. या घोषणेनंतर भाजपने इंडिया, हे इंग्रजांनी दिलेल्या गुलामगिरीचे नाव असल्याचे म्हणत, विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. 

 

टॅग्स :asia cupएशिया कप 2023BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव