शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 12:52 IST

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली.

सुलतानपूर:उत्तर प्रदेशमध्ये आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपसह अन्य पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठीही विविध पक्ष आघाडी, युती करत आहेत. तर, शेतकरी नेते भाजपविरोधी प्रचार करताना दिसत आहेत. यातच एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली असून, यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. (asaduddin owaisi slams mayawati and akhilesh yadav on narendra modi as a prime minister)

एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय; ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

असदुद्दीन ओवेसी यांनी अयोध्येतील रुदौली येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा प्रचार सुरू केल्यानंतर सुलतानपूर जिल्ह्यातील ओड्रा गावात एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी एमआयएम पक्षाने राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात मते फोडल्याचे विराधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले.

शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!

लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली

सुलतानपूरमध्ये सर्वांनी अखिलेश यादव यांना भरभरून मते दिली तर तिथून भाजपाचे आमदार सूर्यभान सिंह कसे निवडून आले. तसेच २०१९ मध्येही लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली. तेव्हा तर मी निवडणूक लढवत नव्हतो. निवडणुकीनंतर अखिलेश यादव म्हणाले की हिंदूंनी मतदान न केल्याने मी हरलो असं न म्हणता, मुसलमानांनी मत न दिल्याचा आरोप केला. मुसलमान काय कैदी आहेत का, असा सवाल करत तसेच दोन्ही वेळा भाजपा मुस्लिमांच्या मतांनी जिंकली नाही, असे ओवेसी म्हणाले. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती या दोघांच्या चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले, अशी टीकाही त्यांनी केली. 

“या ५ प्रश्नांची उत्तर द्या, एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?”; भाजपचा पलटवार

आम्ही हरलो पण लाखो मते मिळवली

लोकसभा निवडणुकीत एमआयएमने हैदराबाद, औरंगाबाद आणि किशनगंजमधून तीन जागा जिंकल्या. आम्ही हैदराबादमध्ये भाजपचा पराभव केला. मोदी आणि अमित शहा आम्हाला हरवायला आले होते, पण तरीही ते हरले. औरंगाबादमध्ये एमआयएमने शिवसेनेच्या खासदाराचा २१ वर्षांनी पराभव केला. किशनगंजमध्ये आम्ही हरलो पण आम्हाला लाखो मते मिळाली. मी जिथे लढतो तिथे भाजप जिंकत नाही. विधानसभा आणि संसदेत आवाज उठवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी असावा अशी आमची इच्छा आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्व आपल्या लोकांना निवडून पाठवू. सपा, बसपा आणि काँग्रेसने आतापर्यंत तुमचे खूप शोषण केले. आता हे थांबवायला हवे, या शब्दांत ओवेसी यांनी हल्लाबोल केला.  

टॅग्स :PoliticsराजकारणAkhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेशAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी