शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 12:52 IST

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली.

सुलतानपूर:उत्तर प्रदेशमध्ये आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपसह अन्य पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठीही विविध पक्ष आघाडी, युती करत आहेत. तर, शेतकरी नेते भाजपविरोधी प्रचार करताना दिसत आहेत. यातच एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली असून, यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. (asaduddin owaisi slams mayawati and akhilesh yadav on narendra modi as a prime minister)

एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय; ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

असदुद्दीन ओवेसी यांनी अयोध्येतील रुदौली येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा प्रचार सुरू केल्यानंतर सुलतानपूर जिल्ह्यातील ओड्रा गावात एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी एमआयएम पक्षाने राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात मते फोडल्याचे विराधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले.

शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!

लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली

सुलतानपूरमध्ये सर्वांनी अखिलेश यादव यांना भरभरून मते दिली तर तिथून भाजपाचे आमदार सूर्यभान सिंह कसे निवडून आले. तसेच २०१९ मध्येही लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली. तेव्हा तर मी निवडणूक लढवत नव्हतो. निवडणुकीनंतर अखिलेश यादव म्हणाले की हिंदूंनी मतदान न केल्याने मी हरलो असं न म्हणता, मुसलमानांनी मत न दिल्याचा आरोप केला. मुसलमान काय कैदी आहेत का, असा सवाल करत तसेच दोन्ही वेळा भाजपा मुस्लिमांच्या मतांनी जिंकली नाही, असे ओवेसी म्हणाले. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती या दोघांच्या चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले, अशी टीकाही त्यांनी केली. 

“या ५ प्रश्नांची उत्तर द्या, एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?”; भाजपचा पलटवार

आम्ही हरलो पण लाखो मते मिळवली

लोकसभा निवडणुकीत एमआयएमने हैदराबाद, औरंगाबाद आणि किशनगंजमधून तीन जागा जिंकल्या. आम्ही हैदराबादमध्ये भाजपचा पराभव केला. मोदी आणि अमित शहा आम्हाला हरवायला आले होते, पण तरीही ते हरले. औरंगाबादमध्ये एमआयएमने शिवसेनेच्या खासदाराचा २१ वर्षांनी पराभव केला. किशनगंजमध्ये आम्ही हरलो पण आम्हाला लाखो मते मिळाली. मी जिथे लढतो तिथे भाजप जिंकत नाही. विधानसभा आणि संसदेत आवाज उठवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी असावा अशी आमची इच्छा आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्व आपल्या लोकांना निवडून पाठवू. सपा, बसपा आणि काँग्रेसने आतापर्यंत तुमचे खूप शोषण केले. आता हे थांबवायला हवे, या शब्दांत ओवेसी यांनी हल्लाबोल केला.  

टॅग्स :PoliticsराजकारणAkhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेशAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी