शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 12:52 IST

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली.

सुलतानपूर:उत्तर प्रदेशमध्ये आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपसह अन्य पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठीही विविध पक्ष आघाडी, युती करत आहेत. तर, शेतकरी नेते भाजपविरोधी प्रचार करताना दिसत आहेत. यातच एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मायावती आणि अखिलेख यादव यांच्यावर जोरदार टीका केली असून, यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचा आरोप ओवेसी यांनी केला आहे. (asaduddin owaisi slams mayawati and akhilesh yadav on narendra modi as a prime minister)

एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे दिसतेय; ईडी कोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

असदुद्दीन ओवेसी यांनी अयोध्येतील रुदौली येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा प्रचार सुरू केल्यानंतर सुलतानपूर जिल्ह्यातील ओड्रा गावात एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी एमआयएम पक्षाने राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात मते फोडल्याचे विराधकांचे आरोप त्यांनी फेटाळून लावले.

शरद पवार घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!

लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली

सुलतानपूरमध्ये सर्वांनी अखिलेश यादव यांना भरभरून मते दिली तर तिथून भाजपाचे आमदार सूर्यभान सिंह कसे निवडून आले. तसेच २०१९ मध्येही लोकसभा निवडणूक भाजपाने कशी जिंकली. तेव्हा तर मी निवडणूक लढवत नव्हतो. निवडणुकीनंतर अखिलेश यादव म्हणाले की हिंदूंनी मतदान न केल्याने मी हरलो असं न म्हणता, मुसलमानांनी मत न दिल्याचा आरोप केला. मुसलमान काय कैदी आहेत का, असा सवाल करत तसेच दोन्ही वेळा भाजपा मुस्लिमांच्या मतांनी जिंकली नाही, असे ओवेसी म्हणाले. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती या दोघांच्या चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले, अशी टीकाही त्यांनी केली. 

“या ५ प्रश्नांची उत्तर द्या, एवढी अपेक्षा मराठी जनता ठेऊ शकते ना?”; भाजपचा पलटवार

आम्ही हरलो पण लाखो मते मिळवली

लोकसभा निवडणुकीत एमआयएमने हैदराबाद, औरंगाबाद आणि किशनगंजमधून तीन जागा जिंकल्या. आम्ही हैदराबादमध्ये भाजपचा पराभव केला. मोदी आणि अमित शहा आम्हाला हरवायला आले होते, पण तरीही ते हरले. औरंगाबादमध्ये एमआयएमने शिवसेनेच्या खासदाराचा २१ वर्षांनी पराभव केला. किशनगंजमध्ये आम्ही हरलो पण आम्हाला लाखो मते मिळाली. मी जिथे लढतो तिथे भाजप जिंकत नाही. विधानसभा आणि संसदेत आवाज उठवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी असावा अशी आमची इच्छा आहे. हे तेव्हाच होईल जेव्हा आपण सर्व आपल्या लोकांना निवडून पाठवू. सपा, बसपा आणि काँग्रेसने आतापर्यंत तुमचे खूप शोषण केले. आता हे थांबवायला हवे, या शब्दांत ओवेसी यांनी हल्लाबोल केला.  

टॅग्स :PoliticsराजकारणAkhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेशAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी