शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:47 IST

Asaduddin Owaisi on all-party meeting: केंद्र सरकारने आज (24 एप्रिल) पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Asaduddin Owaisi on all-party meeting:जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (24 एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. या बैठकीला सर्व पक्षांच्या नेत्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल माहिती दिली जाईल आणि त्यांचे मत जाणून घेतले जातील. दरम्यान, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी या बैठकीला आमंत्रित न केल्यामुळे नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले ओवेसी ?असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पहलगाम हल्ल्यावर होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीबद्दल त्यांनी काल रात्री किरण रिजिजू यांच्याशी चर्चा केली. रिजिजू म्हणाले की, ज्या पक्षांचे 5 किंवा 10 खासदार आहेत, त्यांनाच बोलावण्यात येणार आहे. मी रिजिजूंना विचारले की, कमी खासदार असलेल्या पक्षांना का बोलावले जात नाही? त्यावर ते बैठक खूप लांबेल. मग मी त्यांना म्हणाले, मग आमचे काय?, तर रिजिजू गमतीने म्हणाले, तुमचा आवाज खूप मोठा आहे.

ओवेसी पुढे म्हणतात, ही भाजप किंवा कोणत्याही एका पक्षाची बैठक नाही, तर ही सर्वपक्षीय बैठक आहे. याचा उद्देश दहशतवाद आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांविरुद्ध एकजूट आणि मजबूत संदेश देणे आहे. पंतप्रधान मोदी सर्व पक्षांचे म्हणणे ऐकण्यासाठी एक तास जास्त देऊ शकत नाहीत का? एखाद्या पक्षाचा 1 खासदार असोत किंवा 100, ते सर्व भारतीय जनतेने निवडून दिलेले असतात आणि इतक्या मोठ्या मुद्द्यावर प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे, असे मत ओवेसींनी व्यक्त केले.

ओवेसींची पंतप्रधान मोदींना विनंतीओवेसी पुढे म्हणाले, हा राजकीय मुद्दा नाही, तर देशाशी संबंधित एक मोठा मुद्दा आहे. म्हणून प्रत्येक पक्षाचे विचार ऐकले पाहिजेत. पंतप्रधान मोदींना विनंती करतो की, त्यांनी ही बैठक खऱ्या अर्थाने सर्वपक्षीय बैठक बनवावी. ज्या पक्षांचे खासदार संसदेत आहेत, त्या सर्व पक्षांना या बैठकीला बोलावले पाहिजे.

सर्वपक्षीय बैठक कधी बोलावली जाते?बुधवारी सर्व पक्षांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केली. जेव्हा देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो, तेव्हा सरकार सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलावते आणि चर्चा करते. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर किंवा 2020 मध्ये भारत-चीन तणावादरम्यान अशाप्रकारची बैठक बोलवण्यात आली होती. अशा बैठकांचा उद्देश देशाची एकता दर्शविणे आणि सर्व नेते एकत्र येऊन तोडगा काढण्यासाठी चर्चा करणे हा आहे. यासोबतच, विरोधी पक्षाला सरकारला आपले प्रश्न विचारण्याची आणि संपूर्ण माहिती मिळवण्याची संधी मिळते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाcongressकाँग्रेस