शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

RSS Mohan Bhagwat: “मोहन भागवत यांचे भाषण नेहमीप्रमाणे अर्धसत्य आणि खोटेपणाचे होते”; ओवेसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 11:02 AM

RSS Mohan Bhagwat: विजयादशमी समारंभातील भाषणावरून असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मोहन भागवत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शस्त्रपूजन व विजयादशमी समारंभात सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी अगदी ओटीटी प्लॅटफॉर्मपासून ते ड्रग्जपर्यंतच्या अनेक गोष्टींवर परखडपणे भाष्य करून केंद्र सरकारला काही सल्लेही दिले. विजयादशमी समारंभातील भाषणावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मोहन भागवत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांचे भाषण नेहमीप्रमाणे अर्धसत्य आणि खोटेपणाचे होते, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. 

असदुद्दीने ओवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोहन भागवत यांच्या जनसंख्या नियंत्रण धोरण आणि अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या मतांवर आक्षेप नोंदवत टीकास्त्र सोडले आहे. मोहन भागवत यांचे भाषण नेहमीप्रमाणे अर्धसत्य आणि खोटेपणाचे होते. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मियांची संख्या वाढत असल्याचा मोहन भागवत यांचा दावा चुकीचा असून, मुस्लिमांची संख्या वाढत नसून झपाट्याने कमी होत चालली आहे, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. 

भागवत यांनी PM मोदींना याबाबत सांगितले पाहिजे

विवाह झालेल्या मुलांमध्ये ८४ टक्के हिंदूंचा समावेश आहे, असा दावा करत मोहन भागवत यांचे जनसंख्या वाढीचे परिमाण तथ्यहीन आहे. देशाच्या वाढत्या लोकसंख्येसह तरुण वर्गासमोर वाढत चाललेल्या समस्या आणि अडचणी मोठ्या आहेत. बेरोजगारी आणि महागाईमुळे त्यांच्या चिंतेत भर पडत चालली आहे. याबाबतही मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली पाहिजे, असा खोचक सल्ला ओवेसी यांनी दिला आहे. 

दरम्यान, परदेशातून होणारी घुसखोरी व इतर कारणांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन निर्माण होत आहे. हे असंतुलन देशासाठी घातक ठरू शकते व अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. आगामी ५० वर्षांचा विचार करून लोकसंख्या धोरण तयार झाले पाहिजे व ते सर्वांसाठीच लागू करायला हवे, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते.   

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी