शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

निर्दोष असताना सुप्रीम कोर्टात का गेलात? मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात ओवैसींचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:24 IST

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टाने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावर दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

Asaduddin Owaisi on Mumbai Train Blast Case: मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींची पुरावा नसल्याने निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. मुंबईत लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना निर्दोष ठरवण्याचा निकाल मुंबई हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती देत तुरुंगातून सोडलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात जाण्याची आवश्यकता नसल्याच म्हटलं. दुसरीकडे, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.  

२००६ साली झालेल्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना निर्दोष ठरवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. गुरुवारी महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आरोपींना नोटीस बजावली. ज्यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे त्यांना आता अटक केली जाणार नाही तसेच ज्या लोकांना सोडण्यात आले आहे त्यांना निर्दोष मानले जाऊ नये, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हायकोर्टाने आरोपींना निर्दोष घोषित केलेले असताना सरकारला सुप्रीम कोर्टात जायची काय गरज होती? असा सवाल ओवैसी यांनी केला.

"सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली. कोर्टाने असेही म्हटलं की १८ वर्षांनंतर सुटका झालेल्या आरोपींना पुन्हा अटक केली जाणार नाही. मी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विचारतो की जेव्हा ते पूर्णपणे निर्दोष सिद्ध झाले आहेत तेव्हा हे अपील का केले आहे? जर मालेगाव स्फोटातील आरोपी, ज्यावर कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यांनाही निर्दोष सोडण्यात आले तर तुम्ही अजूनही अपील कराल का?" असा सवाल ओवैसी यांनी केला.

"१२ मुस्लिम १८ वर्षांपासून अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात होते जो त्यांनी कधीही केला नाही. १८० कुटुंबांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत. अनेक जखमी झाले आहेत, त्यांच्यासाठी कोणताही उपाय नाही. या प्रकरणातील तपास संस्था असलेल्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का?," असंही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम मार्गावरील सात लोकलच्या डब्यांमध्ये साखळी स्फोट झाले होते. त्यात १८९ प्रवासी ठार झाले आणि ८२४ लोक जखमी झाले. 

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय