शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
2
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
3
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
4
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
5
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
6
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
7
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
8
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
9
म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
10
अमेरिकेच्या संसदेत मोदी-पुतिन यांच्या 'त्या' फोटोवर खळबळ; महिला खासदाराचा ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल
11
FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत
12
"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
सीसीटीव्ही फोटो, व्हायरल व्हॉट्सअॅप चॅट्स; DSP कल्पना वर्मांनी सांगितलं मूळ प्रकरण काय?
14
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून विराट-रोहितचं होणार डिमोशन? BCCI देणार मोठा धक्का, तर ‘या’ खेळाडूंना मिळणार प्रमोशन
15
"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?
16
ठंडा-ठंडा, कूल-कूल! मुंबई माथेरानपेक्षा थंड, राज्यातील बहुतांशी शहरं १० अंशावर
17
Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
18
भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, "सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो..."
20
"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निर्दोष असताना सुप्रीम कोर्टात का गेलात? मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात ओवैसींचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:24 IST

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टाने मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावर दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

Asaduddin Owaisi on Mumbai Train Blast Case: मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींची पुरावा नसल्याने निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. मुंबईत लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना निर्दोष ठरवण्याचा निकाल मुंबई हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती देत तुरुंगातून सोडलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात जाण्याची आवश्यकता नसल्याच म्हटलं. दुसरीकडे, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.  

२००६ साली झालेल्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना निर्दोष ठरवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. गुरुवारी महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आरोपींना नोटीस बजावली. ज्यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे त्यांना आता अटक केली जाणार नाही तसेच ज्या लोकांना सोडण्यात आले आहे त्यांना निर्दोष मानले जाऊ नये, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हायकोर्टाने आरोपींना निर्दोष घोषित केलेले असताना सरकारला सुप्रीम कोर्टात जायची काय गरज होती? असा सवाल ओवैसी यांनी केला.

"सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली. कोर्टाने असेही म्हटलं की १८ वर्षांनंतर सुटका झालेल्या आरोपींना पुन्हा अटक केली जाणार नाही. मी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विचारतो की जेव्हा ते पूर्णपणे निर्दोष सिद्ध झाले आहेत तेव्हा हे अपील का केले आहे? जर मालेगाव स्फोटातील आरोपी, ज्यावर कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यांनाही निर्दोष सोडण्यात आले तर तुम्ही अजूनही अपील कराल का?" असा सवाल ओवैसी यांनी केला.

"१२ मुस्लिम १८ वर्षांपासून अशा गुन्ह्यासाठी तुरुंगात होते जो त्यांनी कधीही केला नाही. १८० कुटुंबांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत. अनेक जखमी झाले आहेत, त्यांच्यासाठी कोणताही उपाय नाही. या प्रकरणातील तपास संस्था असलेल्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल का?," असंही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम मार्गावरील सात लोकलच्या डब्यांमध्ये साखळी स्फोट झाले होते. त्यात १८९ प्रवासी ठार झाले आणि ८२४ लोक जखमी झाले. 

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय