शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

आमचे सरकार येताच गरिबांची बल्ले बल्ले शेतकऱ्यांना एमएसपीसह कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:25 IST

प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते.

प्रयागराज : आमचे सरकार येताच सर्व गरिबांची यादी तयार होईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यांत आम्ही महिन्याला ८५०० रुपये टाकू. आम्ही शेतकऱ्यांना धान्य, बटाटा, ऊस आणि कापसासाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देणार आहोत. आम्ही त्यांचे कर्जही माफ करू, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे म्हटले. 

 प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. ते म्हणाले, ही लढाई राज्यघटनेच्या रक्षणाची आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यघटनेवर आक्रमण करत आहेत. कोणतीही शक्ती बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरू यांच्या राज्यघटनेला मूठमाती देऊ शकत नाही. ही जनतेची राज्यघटना आहे.

बेरोजगार युवकांना देणार १ लाख रुपये, मनरेगाची मजुरी करणार दुप्पटआम्ही बेरोजगार युवकांना दरवर्षी एक लाख रुपये देणार आहोत. अग्निवीर योजना आम्ही कचराकुंडीत फेकू. मनरेगावर काम करणाऱ्यांची मजुरी आणि आशा कार्यकर्त्यांचे मानधन आम्ही दुप्पट करणार आहोत, असेही ते म्हणाले.

हमीभाव देऊ : अखिलेश यादवसमाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सभेला संबोधित केले. आतापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. केंद्रातील सरकारच्या काळात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी काय काय नाही केले गेले. आमचे सरकार येताच शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळेल. ही निवडणूक सामान्य निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. 

एका बाजूला राज्यघटना गुंडाळू पाहणारे ते आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटना वाचवण्याचा प्रयत्न करणारे आम्ही आहोत. भाजपवाल्यांनी सर्व प्रश्नपत्रिका फोडल्या आणि सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या. त्यांनी तरुणांचे भविष्य अंधकारमय केले आहे. आम्ही तुम्हाला नोकरीची हमी देतो. आघाडीचे सरकार आल्यास अग्निवीर योजना गुंडाळली जाईल, असेही अखिलेश म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस