शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमचे सरकार येताच गरिबांची बल्ले बल्ले शेतकऱ्यांना एमएसपीसह कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:25 IST

प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते.

प्रयागराज : आमचे सरकार येताच सर्व गरिबांची यादी तयार होईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यांत आम्ही महिन्याला ८५०० रुपये टाकू. आम्ही शेतकऱ्यांना धान्य, बटाटा, ऊस आणि कापसासाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देणार आहोत. आम्ही त्यांचे कर्जही माफ करू, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे म्हटले. 

 प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. ते म्हणाले, ही लढाई राज्यघटनेच्या रक्षणाची आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यघटनेवर आक्रमण करत आहेत. कोणतीही शक्ती बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरू यांच्या राज्यघटनेला मूठमाती देऊ शकत नाही. ही जनतेची राज्यघटना आहे.

बेरोजगार युवकांना देणार १ लाख रुपये, मनरेगाची मजुरी करणार दुप्पटआम्ही बेरोजगार युवकांना दरवर्षी एक लाख रुपये देणार आहोत. अग्निवीर योजना आम्ही कचराकुंडीत फेकू. मनरेगावर काम करणाऱ्यांची मजुरी आणि आशा कार्यकर्त्यांचे मानधन आम्ही दुप्पट करणार आहोत, असेही ते म्हणाले.

हमीभाव देऊ : अखिलेश यादवसमाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सभेला संबोधित केले. आतापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. केंद्रातील सरकारच्या काळात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी काय काय नाही केले गेले. आमचे सरकार येताच शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळेल. ही निवडणूक सामान्य निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. 

एका बाजूला राज्यघटना गुंडाळू पाहणारे ते आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटना वाचवण्याचा प्रयत्न करणारे आम्ही आहोत. भाजपवाल्यांनी सर्व प्रश्नपत्रिका फोडल्या आणि सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या. त्यांनी तरुणांचे भविष्य अंधकारमय केले आहे. आम्ही तुम्हाला नोकरीची हमी देतो. आघाडीचे सरकार आल्यास अग्निवीर योजना गुंडाळली जाईल, असेही अखिलेश म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस