शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आमचे सरकार येताच गरिबांची बल्ले बल्ले शेतकऱ्यांना एमएसपीसह कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:25 IST

प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते.

प्रयागराज : आमचे सरकार येताच सर्व गरिबांची यादी तयार होईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यांत आम्ही महिन्याला ८५०० रुपये टाकू. आम्ही शेतकऱ्यांना धान्य, बटाटा, ऊस आणि कापसासाठी किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देणार आहोत. आम्ही त्यांचे कर्जही माफ करू, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे म्हटले. 

 प्रयागराज मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ मुंगारी गावात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. ते म्हणाले, ही लढाई राज्यघटनेच्या रक्षणाची आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यघटनेवर आक्रमण करत आहेत. कोणतीही शक्ती बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरू यांच्या राज्यघटनेला मूठमाती देऊ शकत नाही. ही जनतेची राज्यघटना आहे.

बेरोजगार युवकांना देणार १ लाख रुपये, मनरेगाची मजुरी करणार दुप्पटआम्ही बेरोजगार युवकांना दरवर्षी एक लाख रुपये देणार आहोत. अग्निवीर योजना आम्ही कचराकुंडीत फेकू. मनरेगावर काम करणाऱ्यांची मजुरी आणि आशा कार्यकर्त्यांचे मानधन आम्ही दुप्पट करणार आहोत, असेही ते म्हणाले.

हमीभाव देऊ : अखिलेश यादवसमाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सभेला संबोधित केले. आतापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. केंद्रातील सरकारच्या काळात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी काय काय नाही केले गेले. आमचे सरकार येताच शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळेल. ही निवडणूक सामान्य निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. 

एका बाजूला राज्यघटना गुंडाळू पाहणारे ते आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटना वाचवण्याचा प्रयत्न करणारे आम्ही आहोत. भाजपवाल्यांनी सर्व प्रश्नपत्रिका फोडल्या आणि सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या. त्यांनी तरुणांचे भविष्य अंधकारमय केले आहे. आम्ही तुम्हाला नोकरीची हमी देतो. आघाडीचे सरकार आल्यास अग्निवीर योजना गुंडाळली जाईल, असेही अखिलेश म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस