शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

"गेल्या ८ वर्षात जेवढे रस्ते निर्माण झाले, तेवढे मागील ६५ वर्षात बनले नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 20:46 IST

गडकरी यांनी रस्ते विकास आणि वाहनांचे यांत्रिकीकरण यासंदर्भात भाष्य केलं. लोकांना वाटतं की, मी सर्वात चांगलं काम रस्ते, बोगदे आणि पूल बनवून केलं आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सोमवारी लोकांची मने जिंकली. खराब रस्त्यावरून गडकरींनी लोकांची माफी मागितली आहे. मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असताना गडकरींनी मंडलाच्या खराब रस्त्यावरून लोकांना उद्देशून भाषण करताना, तुम्हाला त्रास झाला, मी माफी मागतो, असे म्हटले. गडकरींच्या स्पष्टवक्तेपणावर नेहमीच चर्चा होत असते. अनेकदा ते आपल्याच पक्षातील काही चुकांवरही जाहीरपणे बोट ठेवताना दिसून आले आहेत. त्यामुळे, त्यांच्या भाषणाचं आणि कामाचं नेहमीच कौतुकही होतं. आता, गडकरींनी एक दावा केला आहे. त्यानुसार, गेल्या ८ वर्षात सर्वाधिक रस्ते देशात बनल्याचं त्यांनी म्हटलंय.  

गडकरी यांनी रस्ते विकास आणि वाहनांचे यांत्रिकीकरण यासंदर्भात भाष्य केलं. लोकांना वाटतं की, मी सर्वात चांगलं काम रस्ते, बोगदे आणि पूल बनवून केलं आहे, पण, या देशात १ कोटीपेक्षा जास्त लोक सायकल रिक्षाने लोकांची वाहतूक करत होते, जी अमानवीय होतं. मात्र, आम्ही यांत्रिकीकरणातून ई-रिक्षा आणून हे काम बंद केलं, असे गडकरी यांनी म्हटले, तसेच, गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केलेल्या घोषणांवरही त्यांनी टीका केली. ज्यांना आपण सत्तेत येणार नाहीत हे माहितीय, ते सध्या काहीही वचनं देत आहेत. घोषणा करण्यात, वचनं देण्यात काही फरक पडत नाही. पण, भाजप जे बोलते ते करुन दाखवते, असेही गडकरींनी म्हटले. काँग्रेसवर निशाणा साधताना, गेल्या ८ वर्षात जेवढे रस्ते निर्माण झाले, तेवढे रस्ते मागील ६५ ते ६६ वर्षांतही देशात बनले नाहीत. मला वाटते की २०२४ पर्यंत देशातील रस्ते वाहतूक सुविधा अमेरिकोबरोबरची असेल, असा दावाही गडकरींनी केला आहे.  

गडकरींनी लोकांची मागितली माफी

मध्य प्रदेशच्या मंडलातील रस्त्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला गडकरी आले होते. यावेळी त्यांच्याकडे जबलपुर-मंडला या ४०० कोटींच्या रस्त्याचे खराब काम झाल्याची तक्रार लोकांनी केली. यावर गडकरींनी जर चूक झाली असेल तर माफीही मागायला हवी. ४०० कोटींचा खर्च करून ६३ किमी लांबीच्या दोन लेनचा रस्ता बनविणे सुरु आहे. मी रस्त्याच्या कामावर खूश नाहीय, असे गडकरी म्हणाले. यानंतर लगेचच गडकरींनी या हायवेचे उर्वरीत काम तात्काळ रोखावे, जुने जे काम झालेय त्याची तातडीने दुरुस्ती करावी, नवीन टेंडर काढून चांगला रस्ता करावा, असे आदेश दिले. याचबरोबर आलेल्या लोकांना त्यांनी तुम्हाला जो त्रास झालाय, त्यासाठी मी माफी मागतो, असे म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकcongressकाँग्रेसBJPभाजपा