शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 17:37 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले.

Arvind Kejriwal surrender : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तिहार तुरुंगात अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "आम आदमी पार्टी महत्त्वाची नाही, देश महत्त्वाचा आहे. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहोत. मी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आहे, म्हणून मला कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले, ही हुकूमशाही आहे," अशी टीका केजरीवालांनी केली.

ते पुढे म्हणतात, "ही निवडणूक देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. एक्झिट पोलबद्दल घाबरण्याची गरज नाही, ते सर्व खोटे आहेत. भाजपला जास्त जागा दाखवण्याचे आदेश वरुन आले असतील. त्या बनावट एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, विजय आपलाच होणार आहे. आपल्या प्रत्येकाला लढायचे आहे. ही निवडणूक कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नाही, ही निवडणूक या देशाला वाचवण्यासाठी आहे. भगतसिंग म्हणाले होते की, जेव्हा सत्ता हुकूमशाही बनते, तेव्हा जेल ही जबाबदारी असते. तुरुंगात ते माझ्यासोबत काय करतील माहीत नाही. भगतसिंग यांना फाशी झाली, ते मलादेखील फाशी द्यायला कमी करणार नाहीत."

"मला माहित नाही की, मी तुरुंगातून परत कधी येईन. पण माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे. ईव्हीएमवर लक्ष ठेवा, उमेदवार हरला तरी तुम्ही तिथेच रहा. व्हीव्हीपीएटी स्लिप मशीनशी जुळली नाही, तर निवडणूक रद्द होते. आपण सतर्क राहिले पाहिजे. दाखवण्यात आलेले एक्झिट पोल खोटे आहेत. आम्ही 100 कोटींची लाच घेतली असेल, तर ते पैसे गेले कुठे? त्यांना आमच्याकडून एक रुपयाही मिळाला नाही. देशाच्या इतिहासात सर्वाधिक बहुमताने आलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणतात, "त्याच्या मित्रांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, एक्झिट पोलनंतर बाजार वर जाईल आणि ते पैसे कमावू शकतील, त्यामुळे खोटे एक्झिट पोल दाखवले जात आहेत. हे लोक अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांची हेराफेरी करू शकतात. म्हणूनच मी इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना सांगू इच्छितो की, अंतिम मतमोजणी होईपर्यंत तिथेच रहा, जेणेकरून ते फेरफार करू शकणार नाहीत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा